शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

सक्तीचे शिक्षण हक्क कायद्याची खानापूर्तीच

By admin | Updated: May 20, 2015 00:15 IST

दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ मध्ये लागू झाला.

अंमलबजावणीस टाळाटाळ : अनेक शाळांनी मोफत प्रवेशच दिला नाहीयवतमाळ : दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ मध्ये लागू झाला. राज्यात गेली तीन वर्षांपासून तो अंमलात आला. पण या काळात एकीकडे अनेक शाळांनी या कायद्यान्वये बालकांना मोफत प्रवेश दिला नाही. कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यांच्यावर शिक्षण विभागाने आतापर्यंत एकाही ठिकाणी कारवाई केली नाही. केवळ पत्र, स्मरणपत्र, नोटीस पाठवून निभावून घेतले आहे. दुसरीकडे ज्या शाळांनी बालकांना मोफत प्रवेश दिले त्याची प्रतीपूर्ती शासनाने अजूनही केलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभाग केवळ खानापूर्ती करीत असल्याचे दिसत आहे. २५ टक्के आरक्षण दिल्याचे दाखविले जाते. पण लाभ मिळालेल्या बालकांची नावे जाहीर केली जात नाही. विभागाच्या तपासणीत गैरप्रकार सांभाळून घेतले जातात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शासनाने समित्या स्थापन करणे बंधनकारक केले आहे. पण स्थापन झालेल्या समित्या, येथील बाहेरील सदस्य, पालक सदस्य हे केवळ नावाचेच राहात आहे. या समित्या दरवर्षी शालेय सत्रासाठी घ्यावयाची फी ठरविते. या फीचे दरही संस्थाचालकांच्या मनमर्जीप्रमाणे भरमसाठ राहात आले आहे. नियुक्त पालकही आक्षेप घेत नाही. देखरेख ठेवणारे शिक्षण विभागाचे अधिकारीही शहरी भागाप्रमाणे आणि तितकीच फी ग्रामीण भागातील शाळांनाही घेवू देण्यास वेळोवेळी अनुकूल राहिल्याने अशा काही शिक्षण संस्थांचे चांगलेच फावले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळा आता चालकांना गडगंज कमाईचे एक साधन झाले आहे. या शाळांवर नियुक्त करावयाच्या शिक्षकांची किमान पात्रता काय, त्यांना कोणत्या आधारावर नियुक्ती दिली जाते, याबाबत ठिकठिकाणी सर्वत्र आलबेल असल्याचे दिसून आले आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण मुले-मुली काही ठिकाणी शिकविण्यासाठी असल्याचे दृष्टीस पडते. दोन ते तीन हजार रुपये महिना पगारावर या शाळांत शिक्षक राबवून घेतले जातात. सहा-सहा महिने त्यांना पगार दिला जात नाही. या वेठबिगारीकडेही शिक्षण विभागाने कधी लक्ष दिलेले नाही. प्रवेशाच्यावेळी मोठमोठी आश्वासने पालकांना दिली जातात. प्रत्यक्षात किमान शैक्षणिक सुविधा व वातावरण ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये नाही. आगामी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करून आवश्यक कारवाई आणि सुधारणा करण्याचे आदेश देण्याची गरज आहे. गतवर्षी पालकांनी मुलांना इंग्रजी शाळेत टाकले. दिवाळीनंतर अनेक शेतकऱ्यांचा कृषी हंगाम उलटला. ते उर्वरित फी शाळांना देवू शकले नाही. तेव्हा शाळांनी विद्यार्थ्यांना घरी पाठविले. अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. असे प्रकार काही ठिकाणी झालेले आहेत. यादृष्टीनेही शिक्षण विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. (वार्ताहर)