शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:59 IST

इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला यवतमाळ शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देसराफा बाजार कडकडीत बंद : खासगी वाहतुकीची गती मंदावली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला यवतमाळ शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.सोमवारी स्थानिक बसस्थानक चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. दुपारी विश्रामगृहातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट, राजेंद्र गवई गट आदी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी ‘मोदी हटाव देश बचाव’, ‘शेतकरी विरोधी नरेंद्र मोदी’ असे नारे दिले. त्यानंतर सामूहिकरित्या निवेदन सादर केले. बंदमुळे खासगी वाहतुकीवर परिणाम जाणवला. तर सराफा बाजार पूर्णत: बंद होता.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वॉजा बेग, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा क्रांती राऊत, अनिल गायकवाड, उत्तम गुल्हाने, सिकंदर शहा, प्रमोद तिवारी, मूर्ती सहारे, सतीश मानधना, कौस्तुभ शिर्के, अजय चौपाने, आसिफ अली, कय्यूम खान, वीणा नागदिवे, कृष्णा पुसनाके, सुरेश गरूड, देवीदास चौरे आदी उपस्थित होते.पेट्रोल दरवाढीतून सामान्यांची लूट२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११० डॉलर प्रती बॅरल होत्या. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोलचे दर ८० रूपये होते. तर डिझेलचे दर ६४ रूपये लिटर होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलर प्रती बॅरल आहेत. २०१४ तुलनेत हे दर ३० डॉलरने कमी आहेत. तरीही मुंबईसह राज्यात पेट्रोलचे दर ८७ रूपये आहेत. तर डिझेलचे दर ७६ रूपये ९६ पैसे आहेत. त्यातून सर्वसामान्यांची लूट होत आहे. सरकारने ही लूट थांबवावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली. यावेळी मोदी सरकारविरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली.