शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

चांगल्या कामाचे कौतुक, कामचुकारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:05 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : खड्डे बुजविण्यासाठी डिसेंबरचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात रविवारी सकाळी आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. त्यांनी रस्त्यांच्या डागडुजीसाठी बांधकाम विभाग यंत्रणेला डिसेंबर पर्यंतचा अल्टीमेटमही दिला. राज्यात आत्तापर्यंत कामात कुचराई करणाºया २०० अधिकारी, कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केल्याचे त्यांनी उपस्थित अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच चांगले काम केल्याबद्दल दोन हजार अधिकारी, कर्मचाºयांना बढती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘आता तुम्हाला काय हवं, हे तुम्हीच ठरवा’, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.आढावा बैठकीत त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना काम करताना येणाºया अडचणींबाबत उघडपणे मत मांडण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. यामुळे रस्ते वारंवार खराब होतात. अ‍ॅप डाऊनलोड करून खड्ड्यांचा फोटो तक्रारकर्त्याला थेट मंत्रालयात पाठविता येतो. त्यासाठी मंत्रालयातील सर्व अधिकाºयांवर प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी आपल्या जिल्ह्याचे पालक आहेत. या माध्यमातून पुढील दोन वर्षात महाराष्ट्रातील चित्र बदलण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.राज्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. अंदाजपत्रकात जास्त कामे कशी समाविष्ट करता येईल, याबाबत नियोजन करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन हजार किलोमीटरसाठी ८०० कोटी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी एक हजार किलोमीटरचे कंत्राट निघाले असून १५ दिवसात उर्वरित कामाला मंजुरी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे, रस्त्यांचे काम हे स्वत:चे घर बांधत आहे, अशी भावना ठेवून करावे, असे आवाहन त्यांनी केले. नवीन योजना राबविताना कनिष्ठ कर्मचाºयांना विश्वासात घ्या, एखादी चूक झाल्यास ती त्याने आपल्याला सांगितली पाहिजे, अशी प्रतिमा तयार करा, असे आवाहनही चंद्रकात पाटील यांनी केले.दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता राजू चव्हाण आणि त्यांच्या सहकाºयांचा यावेळी पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य प्रादेशिक अभियंता चंद्रशेखर तुंगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, संभाजी धोत्रे, रवींद्र मालवत यांच्यासह सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता उपस्थित होते.ग्रामीण रस्त्यांसाठी स्वतंत्र युनिटप्रधामंत्री सडक योजना आणि मुुख्यमंत्री सडक योजना जशा वेगळ््या आहे, त्याच धर्तीवर आता ग्रामीण रस्त्यांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे न ठेवता त्यासाठी स्वतंत्र युनिट तयार केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.मंत्र्यांच्या वक्तशीरपणामुळे अभियंत्यांची धावपळमुुबंई वरून आल्यानंतरही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सकाळी ८.१० वाजता बैठक सुरू केली. मात्र तोपर्यंत अनेक अभियंते बैठकीला पोहोचले नव्हते. त्यांनी उशिरा बैठकीला हजेरी लावली. तब्बल पावणे दोन तास ही बैठक चालली. यात प्रत्येक बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील