शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सोयाबीनच्या नऊ हजारांवर तक्रारी, गुन्हे मात्र दोनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:52 IST

अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले.

ठळक मुद्देसर्वाधिक तक्रारी यवतमाळातकंपन्यांची मुजोरी, प्रमुख वितरकांविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष कायम

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाच्या हंगामात उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले. ते पाहता बियाणे कंपन्यांना कृषी विभाग पाठीशी तर घालत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन ४० ते ५० रुपये किलोने विकला. सोयाबीनचे बियाणे मात्र ८० ते ९० रुपये किलो दराने शेतकऱ्यांना खरेदी करावे लागले. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी दाग-दागिना मोडून, उसनवारी करून पैशाची तजवीज केली व नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी केली. परंतु प्रत्यक्षात हे महागडे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक झाली. आता शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. या उलट काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले आणि ते उगवलेसुद्धा. त्यामुळे कंपन्यांच्या बियाण्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

कृषी केंद्रांना हवे पोलीस संरक्षणसोयाबीनचे पेरलेले बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये धडक दिली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागण्याची वेळ आली.

तक्रारींचे ६५ टक्के पंचनामे उरकलेशेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बोगस बियाण्यांबाबत तक्रारींचा सपाटा लावला आहे. अमरावती विभागात गत आठवड्यापर्यंत नऊ हजार ३८० तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. हा आकडा दहा हजारांवर जाणार आहे. त्यातील सर्वाधिक ४ हजार ७४९ तक्रारी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. विभागात या तक्रारींचे ६० टक्के पंचनामे उरकण्यात आले आहे.

कृषिमंत्र्यांचे आदेश, पण गुन्हे नाममात्रबोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीने एक तर शेतकऱ्यांना बियाणे बदलवून द्यावे किंवा दोन दिवसात नुकसानभरपाई द्यावी असे आदेश कृषी मंत्र्यांनी जारी केले होते. जी बियाणे कंपनी या तडजोडीला तयार नसेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले गेले होते.

केवळ बुलडाणा, वाशिममध्ये गुन्हाअमरावती विभागात आतापर्यंत केवळ बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड विरुद्ध तर वाशिम जिल्ह्यात ईगल कंपनीविरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा नोंदविला गेला. नऊ हजार तक्रारी आणि दोनच गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.शेतकऱ्यांना तत्काळ बियाणे बदलवून मिळावे, खरिपाचा हंगाम निघून जावू नये, शेतकºयाचे नुकसान होऊ नये हा प्रयत्न आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवली जावू शकते.- सुभाष नागरेसहसंचालक (कृषी), अमरावती

टॅग्स :agricultureशेती