शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विकास कामांवर जेसीबी, पोकलॅन्डचा सर्रास वापर

By admin | Updated: April 22, 2017 01:42 IST

जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमधून विकास कामे सुरू आहेत. मात्र ही बहुतांश कामे जेसीबी, पोकलॅन्ड

प्रशासनाचा निष्कर्ष : रोहयो कामांचा लोकप्रतिनिधींचा आग्रह फेटाळला यवतमाळ : जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमधून विकास कामे सुरू आहेत. मात्र ही बहुतांश कामे जेसीबी, पोकलॅन्ड व अन्य यंत्रांद्वारे केली जात आहेत. तेथे मजुरांची आवश्यकता नाही. पर्यायाने मजुरांकडून कामाची मागणीही नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची आता गरज नाही, असा निष्कर्ष जिल्हा परिषद प्रशासनाने काढला आहे. याच आधारावर युती सरकारमधील एका बड्या लोकप्रतिनिधीने रोहयोची कामे सुरू करण्याचा केलेला आग्रह प्रशासनाने फेटाळून लावला. १४ एप्रिल रोजी एक सार्वजनिक कार्यक्रम सुरू असताना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला बड्या लोकप्रतिनिधीचा फोन आला. त्यांनी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची सूचना केली. मात्र मजुरांकडून कुठेही कामांची मागणी शासकीय दप्तरी नोंदविली गेली नसल्याने रोहयोची कामे सुरू करण्याची सध्यातरी गरज नसल्याचे प्रशासनातील या अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर लोकप्रतिनिधीने किमान आपल्या मतदारसंघातील एका तालुक्यात तरी ही कामे सुरू करावी, असा आग्रह धरला. तेव्हा शासनाच्या बहुतांश योजनांमधील कामे यंत्राद्वारेच केली जात असून तेथे मजुरांची उपस्थिती नगण्यच असते. त्यामुळे रोहयोच्या कामांची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले. मात्र ते लोकप्रतिनिधी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी आपला रोहयोची कामे सुरू करण्याचा हेका कायम ठेवला. सभ्य भाषेत सदर लोकप्रतिनिधी ऐकत नसल्याचे पाहून अखेर प्रशासन संतापले. तुम्ही सरकारचे घटक असताना आमच्यावर चुकीच्या व गरज नसलेल्या कामांसाठी दबाव कसा काय आणता अशा शब्दात प्रशासनाने या लोकप्रतिनिधीला जाब विचारल्याचे सांगितले जाते. यावेळी प्रशासनाचा सूर संतप्त असल्याने ‘हॉट टॉक’ झाल्याचेही समजते. (जिल्हा प्रतिनिधी)