शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

वने सोडली वाऱ्यावर समित्या कागदावरच

By admin | Updated: November 25, 2014 23:04 IST

vलोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या़ मात्र या समित्या हल्ली कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे़

नांदेपेरा : लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या़ मात्र या समित्या हल्ली कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे़नांदेपेरा, सोनापूर, लाखापूर या गावाला लागून झुडपी जंगल आहे़ या जंगलातील वृक्षांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे़ काहींनी जंगलावर अतिक्रमण करून शेती वहिती केली आहे़ त्यामुळे हे जंगल पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ काही अतिक्रमणधारकांनी अधेमधे कुठेही जंगलतोड करून शेती वहिती केली आहे़ त्यामुळे जनावरांना चाराही शिल्लक राहिला नाही़ काही चारा शिल्लक आहे, मात्र तेथपर्यंत जनावरांना जाण्याकरिता रस्ता नाही़ त्यामुळे अतिक्रमणधारक व गुराख्यांमध्ये नेहमीच वाद होत आहेत.जंगलावर नेमकी मालकी कुणाची, असा प्रश्न आता जनावर मालकांना पडत आहे़ गुराख्यांनी चारा नसल्यामुळे गुराखीपणा सोडून दिला आहे़ त्यामुळे काही शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी व गुराखी जनावरांची राखन करीत नसल्याने बाजारात जनावरांची विक्री करणे सुरू केले आहे़ दरम्यान या सर्व घटनकांची वन विभागाला तातडीने माहिती मिळावी, याकरिता वन संरक्षण समित्या स्थापन करण्यात आलया आहेत. मात्र जे ग्रामस्थ वन संरक्षण समितीत सदस्य आहेत, त्यांना आपले कर्तव्य काय आहे, याचीच कोणतीही कल्पना नाही़ या समित्यांना अनेक अधिकार असताना सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीवच करून देण्यात आली नाही़ त्यामुळे समित्या केवळ कागदोपत्री असून या समित्या नावापुरत्याच उरल्या आहे. वन संरक्षण समित्या कागदावरच राहिल्याने वने संकटात सापडली आहे़ वन विभागाचे कर्मचारीही कुंभकर्णी झोपेत असून वनांच्या संरक्षणाची जबाबदारी असताना ते कोणतीही कारवाई करताना दिसत नाही़ नांदेपेरा लगतच मच्छिंद्रा या गावाला लागलेलया जंगलात मौल्यवान झाडे आहेत़ त्यांची कत्तल होत आहे. रात्री तोड होत असताना वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे़ (वार्ताहर)