शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

वने सोडली वाऱ्यावर समित्या कागदावरच

By admin | Updated: November 25, 2014 23:04 IST

vलोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या़ मात्र या समित्या हल्ली कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे़

नांदेपेरा : लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या़ मात्र या समित्या हल्ली कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे़नांदेपेरा, सोनापूर, लाखापूर या गावाला लागून झुडपी जंगल आहे़ या जंगलातील वृक्षांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे़ काहींनी जंगलावर अतिक्रमण करून शेती वहिती केली आहे़ त्यामुळे हे जंगल पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ काही अतिक्रमणधारकांनी अधेमधे कुठेही जंगलतोड करून शेती वहिती केली आहे़ त्यामुळे जनावरांना चाराही शिल्लक राहिला नाही़ काही चारा शिल्लक आहे, मात्र तेथपर्यंत जनावरांना जाण्याकरिता रस्ता नाही़ त्यामुळे अतिक्रमणधारक व गुराख्यांमध्ये नेहमीच वाद होत आहेत.जंगलावर नेमकी मालकी कुणाची, असा प्रश्न आता जनावर मालकांना पडत आहे़ गुराख्यांनी चारा नसल्यामुळे गुराखीपणा सोडून दिला आहे़ त्यामुळे काही शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी व गुराखी जनावरांची राखन करीत नसल्याने बाजारात जनावरांची विक्री करणे सुरू केले आहे़ दरम्यान या सर्व घटनकांची वन विभागाला तातडीने माहिती मिळावी, याकरिता वन संरक्षण समित्या स्थापन करण्यात आलया आहेत. मात्र जे ग्रामस्थ वन संरक्षण समितीत सदस्य आहेत, त्यांना आपले कर्तव्य काय आहे, याचीच कोणतीही कल्पना नाही़ या समित्यांना अनेक अधिकार असताना सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीवच करून देण्यात आली नाही़ त्यामुळे समित्या केवळ कागदोपत्री असून या समित्या नावापुरत्याच उरल्या आहे. वन संरक्षण समित्या कागदावरच राहिल्याने वने संकटात सापडली आहे़ वन विभागाचे कर्मचारीही कुंभकर्णी झोपेत असून वनांच्या संरक्षणाची जबाबदारी असताना ते कोणतीही कारवाई करताना दिसत नाही़ नांदेपेरा लगतच मच्छिंद्रा या गावाला लागलेलया जंगलात मौल्यवान झाडे आहेत़ त्यांची कत्तल होत आहे. रात्री तोड होत असताना वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे़ (वार्ताहर)