शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

जिल्ह्यात कलेक्टर, सीईओ, एसपी सारेच महाराष्ट्रीयन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

आयएएस असो वा आपीएस लोकसेवा आयोगातून नियुक्ती झाल्यावर प्रत्येक अधिकाऱ्याला स्थानिक भाषेशी दोस्ती करावीच लागते. स्थानिकांची भाषा समजून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यकच असते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात नियुक्ती होताना आधी मराठीची परीक्षा द्यावी लागते. मात्र, आता अस्सल मराठी अधिकारीच जिल्ह्यात दाखल झाल्याने सामान्य नागरिक अन् प्रशासन प्रमुख यांची खरी जवळीक होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रशासनात मराठी टक्का वाढला : जिल्ह्याच्या ‘वऱ्हाडी’शी समरस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘प्युअर’ मराठी बोलणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासन अनेकदा हिंदी व अन्य भाषिक अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले गेले. ते अधिकारी चांगले असले तरी त्यांच्यापर्यंत प्रश्न घेऊन पोहोचणाऱ्या खेड्यापाड्यातील जिल्हावासीयांना अनेकदा अडचणी येत होत्या; पण आता अनेक वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला संपूर्ण मराठी अधिकारी लाभले आहेत. जिल्हा प्रशासनातील हा वाढलेला मराठीचा टक्का जिल्ह्याच्या विकासाला खास ‘मराठी’ स्पर्श देणार का, अशी आशा सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली आहे.आयएएस असो वा आपीएस लोकसेवा आयोगातून नियुक्ती झाल्यावर प्रत्येक अधिकाऱ्याला स्थानिक भाषेशी दोस्ती करावीच लागते. स्थानिकांची भाषा समजून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यकच असते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात नियुक्ती होताना आधी मराठीची परीक्षा द्यावी लागते. मात्र, आता अस्सल मराठी अधिकारीच जिल्ह्यात दाखल झाल्याने सामान्य नागरिक अन् प्रशासन प्रमुख यांची खरी जवळीक होण्याची शक्यता आहे.नवे जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे आले आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण बालपण महाराष्ट्रात घालविलेले येडगे यांनी पूर्वी अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम केले. त्यामुळे वऱ्हाड कसा आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत. तर गेल्या वर्षीच यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पदभार स्वीकारला. तेही मूळचे महाराष्ट्रीय (लातूर) असून मराठी जनमानस त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तर काही महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डाॅ. दिलीप पाटील भुजबळ बुलडाण्यातून यवतमाळात आले. ते मूळचे जुन्नर (पुणे) येथील आहेत.  हे तिन्ही आयएएस, आयपीएस अधिकारी जिल्हा प्रशासनाची धुरा सांभाळत आहेत. महाराष्ट्राच्या मराठीसोबत त्यांचे जन्मजात नाते आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांना अडचण येत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य माणसे प्रमाण मराठीपेक्षाही अधिक ठसकेदार वऱ्हाडी बोलतात. त्या ‘प्युअर’ भाषेचीही आता या अधिकाऱ्यांनी ओळख करून घेतली आहे. मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हावासीयांनाही त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी घेऊन जाताना ‘आपलेपणा’ जाणवतो, तो त्यांच्या भाषेमुळेच; पण जिल्ह्यातील प्रश्न ताकदीने सोडवायचे असतील, तर भाषेसोबत स्थानिक जनजीवनही जाणून घेणे आवश्यक आहे.

तब्बल दहा वर्षानंतर लाभले ‘आपलेपण’  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे तिन्ही जिल्हा प्रशासनाचे आधारस्तंभ अस्सल मराठी आहेत. दहा वर्षापूर्वी असा योग डाॅ. हर्षदीप कांबळे, डाॅ. श्रीकर परदेशी आणि हिंमतराव देशभ्रतार यांच्या निमित्ताने साधला गेला. त्यानंतर आता हा ‘आपलेपणा’ पुन्हा परतला आहे. 

 

टॅग्स :marathiमराठी