शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

By admin | Updated: June 26, 2015 02:24 IST

दोन तास फेरफटका : अतिक्रमणासह रस्त्यावरील भाजीबाजार हटविण्याचे निर्देश

यवतमाळ : आपल्या धडाकेबाज शैलीने प्रशासकीय यंत्रणेला शिस्त लावल्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह शहराला शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर उतरले. गुरुवारी तब्बल दोन तास शहराचा फेरफटका मारून त्यांनी नगरपरिषद यंत्रणेसह व्यापारी आणि नागरिकांना सूचना दिल्या. दुकानासमोरील शेडचे अतिक्रमण, अतिक्रमित दुकाने आणि रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह गुरुवारी सकाळी ८ वाजता दत्त चौक परिसरात दाखल झाले. त्यांच्या सोबत नगर परिषद आणि महसूल विभागाची यंत्रणाही होती. यावेळी त्यांनी संतसेना चौक ते जाजू चौक परिसरात रस्त्यावर भरणारा भाजीबाजार अनुभवला. रस्त्यावर भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जिल्हाधिकाऱ्यांनी हा भाजीबाजार तत्काळ नियोजित जागी भरविण्याचे निर्देश दिले. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानासमोर कचराकुंडी ठेवावी, नागरिकांनीसुद्धा सहकार्य करीत कचराकुंडीतच कचरा टाकावा असे निर्देश दिले. नागरिकांच्या सहकार्याशिवाय शहर स्वच्छ राहणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आठवडीबाजार परिसरात वळविला. त्या ठिकाणी त्यांनी मटन, चिकन आणि मासोळी बाजाराची पाहणी केली. फळाच्या मार्केट संदर्भातही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांना निर्देश दिले. त्यानंतर कळंब चौक, महात्मा फुले चौक परिसराची पाहणी केली. कळंब चौकात दुकानांचे अतिक्रमण आढळून आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता रमजान महिना सुरू असल्याने तात्पुरते अतिक्रमण असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे अतिक्रमण रमजान संपताच निघाले पाहिजे, अशी तंबी त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना दिली. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करीत दुकानासमोर लावलेले ओटे, शेड काढून टाकावे, भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर बाजार न भरविता मार्केटमध्ये दिलेल्या जागेत बसून व्यवसाय करावा, अशी सूचना दिली. ज्यांनी अतिक्रमण केले त्यांनी ते स्वत:च तातडीने काढून टाकण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, नगर अभियंता रावसाहेब पालकर, महेश जोशी, डॉ. विजय अग्रवाल उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)