शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध

By admin | Updated: August 12, 2016 02:09 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे

जिल्हा परिषद : स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्षांना ‘प्रभारा’तून डावलल्याचे राजकारण यवतमाळ : जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँगे्रस आघाडीची सत्ता आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना, भाजप, मनसे, अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. परिणामी काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दरी रूंदावत गेली. मात्र दोन वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षातील धुरीणांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी भावी काळातील धोके ओळखून एकत्रित येण्याचे निश्चित केले. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली. या आघाडीने सत्ता स्थापन केली. ठरल्यानुसार ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्या नशीबी आले. मात्र गेली दोन वर्षे या दोन्ही पक्षात सतत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काही सदस्य काँग्रेसला जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सभापती मात्र सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कसरत करीत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असूनही त्यांच्यात वर्चस्वाची छुपी लढाई सुरू आहे. प्रशासनावर आपलाच वचक राहावा, यासाठी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. यातूनच त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. आत्तापर्यंत पडद्याआड सुरू असलेले हे युद्ध आता उघड झाले आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सतत प्रशासनावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यातून काँग्रेसमध्ये प्रचंड खदखद सुरू आहे. तथापि काँग्रेसचे काही वजनदार सदस्य मात्र आपला कार्यभाग साधून घेण्यात माहीर असल्याने त्यांना या शीतयुद्धात कोणतेही स्वारस्य नाही. आपले काम उरकून घेण्यासाठी ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशीही गोडीगुलाबीने वागत आहे. (शहर प्रतिनिधी) सभापतीला सुत्रे देण्यामागील रहस्य गुलदस्त्यात स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतात. मात्र त्यांच्या रजा कालावधीत, गैरहजेरीत अथवा अनुपस्थितीत उपाध्यक्ष अध्यक्षपद भूषवितात. राजकारणात तसे संकेत आहे. मात्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आक्रीत घडले. अध्यक्ष बैठकीला उपस्थित नसताना आणि उपाध्यक्ष उपस्थित असतानाही, चक्क बांधकाम समिती सभापतींनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. वास्तविक अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्षांचा तो हक्क होता. तथापि उपाध्यक्ष काँग्रेसचे असल्याने जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी आपला प्रभार आपल्याच पक्षाच्या सभापतींकडे सोपविला, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या बैठकीत या दोन्ही पक्षातील सुदोपसुंदी उघड झाली आहे.