शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मारेगावात नाफेडची तूर खरेदी बंद

By admin | Updated: March 3, 2017 02:04 IST

मागीलवर्षी तुरीची डाळ २०० रूपयांवर गेली. म्हणून यंदा शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळला.

बारदाणा संपला : आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचा केंद्रावर मुक्काममारेगाव : मागीलवर्षी तुरीची डाळ २०० रूपयांवर गेली. म्हणून यंदा शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळला. पण भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत नाफेड खरेदी सुरू करण्यात आली. परंतु आठ दिवसांपासून बारदाणा नसल्याचे कारण देत नाफेडने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडून आहे. हीच संधी साधत व्यापाऱ्याने तुरीचे भाव पाडले असून १० हजारांची तूर खासगीमध्ये साडेतीन हजार रूपयात खरेदी करीत आहे.गेल्या वर्षी तुरीचे दर १२ हजार रूपयांच्यावर गेले होते. कापूस, सोयाबीनचे दर गेल्यावर्षी कोसळल्याने तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीकडे वळला. पावसाने साथ दिल्याने उत्पादनही समाधानकारक मिळाले. परंतु यावर्षी भाव कोसळल्याने शासनाने हमी भावाने नोफडमार्फत खरेदी सुरू केली. आधारभूत किंमत चार हजार ६२५ रूपये व ४२५ रूपये बोनस असा पाच हजार ५० रूपयांचा भाव ठरविण्यात आला. खुल्या बाजारात मात्र केवळ साडेतीन हजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर गर्दी केली. येथील बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र आहे. परंतु आठ दिवस या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर आता बारदाणा संपला म्हणून २३ फेब्रुवारीपासून हे केंद्र बंद आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात असलेली तूर खुल्या बाजारात तुरीचे अल्प दर आणि नाफेड खरेदी बंद होण्याची भिती, यामुळे शेतकरी बैलगाड्या व इतर वाहने घेऊन आठ दिवसांपासून ३९ शेतकरी बाजार समितीच्या यार्डामध्येच मुक्कामी आहेत. आठ दिवसांपासून बारदाण येणार, असे सांगत असले तरी बारदाणा फारच अल्प येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे केंद्रावर गोंधळ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)