शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचे अपयश झाकण्यासाठी सेनेचा बंद

By admin | Updated: June 29, 2016 02:28 IST

जिल्ह्यासह शहरात सातत्याने दरोडा, बलात्कार, खून, गँगवॉर यासारख्या घटना होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पत्रपरिषद : शहर काँग्रेसचा आरोप, सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाहीयवतमाळ : जिल्ह्यासह शहरात सातत्याने दरोडा, बलात्कार, खून, गँगवॉर यासारख्या घटना होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पालकमंत्री संजय राठोड याला सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांचे अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी शिवसैनिकांनीच यवतमाळ बंद पुकारला, असा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत केला. जिल्ह्यात खासदार आणि पालकमंत्री हे दोन्ही शिवसेनेचे आहेत. प्रशासनावर वचक बसविण्यात दोघेही अपयशी झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. निष्क्रिय आणि क्षमता नसलेले लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर काय होते, याचा अनुभव जिल्ह्यातील जनता घेत आहे. पालकमंत्र्याच्या पक्षातीलच पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन पुकरावे लागत असेल तर पालकमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जनआंदोलनाच्या नावाखाली शिवसेनाच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. महागाव येथे आमदारांच्या घरावर गेलेल्या सर्व पक्षीय मोर्चातील शिवसैनिकांनीच आतातायीपणा दाखविला. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला. सत्ताधारीच आंदोलन करत असल्याने एक विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे. उद्या पालकमंत्री अधिकारी ऐकत नाही म्हणून उपोषणाला बसले तर कुणला नवल वाटू नये, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला. काँग्रेसच्या या भूमिकेचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे निरिक्षक श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री संजय देशमुख आदी उपस्थित असल्याचे पवार यांनी सांगितले. शेतकरी आणि जनता अडचणीत असताना सत्ताधारी शिवसैनिक नौटंकी करत आहे. अधिकार असूनही निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांची बदलीच का करत नाही, असाही प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेला मुळात जनाधार गमावल्याची भीती आहे, त्यामुळेच मंगळवार हा बाजारपेठ बंदचा दिवस पाहूनच शहर बंदची हाक दिली. इतर कुठल्याही दिवशी बंद पुकारला असता तर त्याचा फज्जा उडाला असता. त्यामुळे मंगळवार दिवस निवडण्यात आला, असा आरोप देवानंद पवार यांनी केला. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, घनश्याम अत्रे, सिकंदर शहा, अरुण ठाकुर, उमेश इंगळे, प्रदीप डंभारे, नितीन मिर्झापुरे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)