शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंदच

By admin | Updated: October 3, 2016 00:08 IST

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे.

शेतकरी संभ्रमात : नुकसानीची माहिती ४८ तासात देणे बंधनकारकविवेक ठाकरे  दारव्हा नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अतिपावसाने झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी कशी असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकरी यामुळे संभ्रमात सापडले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. यवतमाळ जिल्ह्यासाठी शासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी निश्चित केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ४८ तासाच्या आत संबंधित केंद्रीय टोल फ्री क्रमांकावर देणे निर्धारित केले आहे. त्यासाठी विमा कंपन्यांचा दूरध्वनी आणि फॅक्स क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून टोल फ्री क्रमांक बंद आहे. सुरुवातीच्या काही दिवसात फॅक्सवरून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. परंतु आता हा क्रमांकही बंद पडला आहे. यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सोयाबीन उद्ध्वस्त झाला असून कपाशी आणि तूर पीकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना लाभदायी ठरते. मात्र या योजनेत अवघ्या ४८ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यातच आता टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स क्रमांकही बंद पडला आहे. त्यामुळे माहिती सांगावी कुणाला असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला. अर्जाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने मुदत वाढवून द्यावी लागली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विमा काढला. मात्र आता नुकसान होत असताना त्यांचा टोल फ्री क्रमांक बंद असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.४४ कोटींचा विमा हप्तायवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ४३ कोटी ६५ लाख रुपयांचा विमा हप्ता सदर कंपनीकडे भरला आहे. त्यात कर्जदार एक लाख ३९ हजार ७२५ शेतकऱ्यांनी ३२ कोटी १३ लाख ३२ हजार आणि बिगर कर्जदार एक लाख ४६ हजार ९१ शेतकऱ्यांनी ११ कोटी ५२ लाख ४७ हजार रुपये भरले आहे. आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना टोल फ्री क्रमांकच बंद आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना टोल फ्री क्रमांक : १८००२७००४६२फॅक्स क्रमांक : ०२०-३०५६५१४३