शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंदच

By admin | Updated: October 3, 2016 00:08 IST

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे.

शेतकरी संभ्रमात : नुकसानीची माहिती ४८ तासात देणे बंधनकारकविवेक ठाकरे  दारव्हा नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अतिपावसाने झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी कशी असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकरी यामुळे संभ्रमात सापडले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. यवतमाळ जिल्ह्यासाठी शासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी निश्चित केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ४८ तासाच्या आत संबंधित केंद्रीय टोल फ्री क्रमांकावर देणे निर्धारित केले आहे. त्यासाठी विमा कंपन्यांचा दूरध्वनी आणि फॅक्स क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून टोल फ्री क्रमांक बंद आहे. सुरुवातीच्या काही दिवसात फॅक्सवरून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. परंतु आता हा क्रमांकही बंद पडला आहे. यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सोयाबीन उद्ध्वस्त झाला असून कपाशी आणि तूर पीकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना लाभदायी ठरते. मात्र या योजनेत अवघ्या ४८ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यातच आता टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स क्रमांकही बंद पडला आहे. त्यामुळे माहिती सांगावी कुणाला असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला. अर्जाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने मुदत वाढवून द्यावी लागली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विमा काढला. मात्र आता नुकसान होत असताना त्यांचा टोल फ्री क्रमांक बंद असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.४४ कोटींचा विमा हप्तायवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ४३ कोटी ६५ लाख रुपयांचा विमा हप्ता सदर कंपनीकडे भरला आहे. त्यात कर्जदार एक लाख ३९ हजार ७२५ शेतकऱ्यांनी ३२ कोटी १३ लाख ३२ हजार आणि बिगर कर्जदार एक लाख ४६ हजार ९१ शेतकऱ्यांनी ११ कोटी ५२ लाख ४७ हजार रुपये भरले आहे. आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना टोल फ्री क्रमांकच बंद आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना टोल फ्री क्रमांक : १८००२७००४६२फॅक्स क्रमांक : ०२०-३०५६५१४३