शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीतही स्पष्ट बहुमताचा कौल

By admin | Updated: July 29, 2015 02:27 IST

ग्रामपंचायत निवडणूकीतील मुद्दे पुर्णत: भिन्न असतात. सर्वात कठीण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो.

स्थिर सत्ता : विधानसभा, लोकसभेची पुनरावृत्ती यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणूकीतील मुद्दे पुर्णत: भिन्न असतात. सर्वात कठीण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो. यात स्पष्टबहुमत अपवादात्मक स्थितीतच मिळते. मात्र नुकत्याच झालेल्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश गावात मतदारांनी स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. स्पष्टबहुमत अथवा एकाच पक्षाला भरघोस मते हा कौल लोकसभा निवडणुकीत आढळून आला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही झाली. मतदारांनी तोच कित्ता ग्रामपंचायतीतही गिरवला आहे. गावातील विशिष्ट एका पॅनललाच बहुमत मिळेल अशा पध्दतीने मतदान झाल्याचे दिसून येते. अन्यथा आतापर्यंत ग्रामपंचायतीतही कुबड्याचे समर्थन घेऊनच सत्ता स्थापन केली जात होती. काठावरच्या बहुमतामुळे अविश्वास आणण्याचेही प्रकार होत होते. अपवादात्मक स्थितीतच एखादा गावात बहुमतातील सरपंच राहत होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी दिलेला कौल एकाच बाजूला गेल्याने पाच वर्षसाठी स्थिर अशी सत्ता स्थापन करणे सोयीस्कर झाले आहे. अनेक गावात उठसूठ अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार घडत होता. त्यालाही आता लगाम बसणार आहे. आता लवकर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. (कार्यालय प्रतिनिधी)