शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहावीच्या विद्यार्थिनींनी परीक्षेचा धसका घेऊन सोडले घर, पोलिसांनी ७२ तासात शोधले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 22:02 IST

यवतमाळातील आर्णी मार्गावर असलेल्या एका विद्यालयातील दोन वर्ग मैत्रिणी अचानकपणे शाळेतून घरी न जाता बाहेरगावी निघून गेल्या.

- सुरेंद्र राऊत 

यवतमाळ : शालेय जीवनात दहावीच्या परीक्षेला पालकांकडून महत्व दिले जाते. शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉर्इंट म्हणून या परीक्षेकडे पाहण्यात येते. त्यामुळे पालक वर्ग दहावीत असलेल्या पाल्यांवर विशेष लक्ष ठेऊन अभ्यास करण्याबाबत पाठपुरावा घेत असतात. अशाच सजग पालकांनी मुलींच्या अभ्यासातील परफॉर्मन्सवरून त्यांची कानउघाडणी केली. यामुळे धास्तावलेल्या मुलींनी थेट शाळेतूनच पलायन केले. सुदैवाने अवधूतवाडी पोलिसांना मुली शोधण्यात ७२ तासातच यश मिळाले. 

यवतमाळातील आर्णी मार्गावर असलेल्या एका विद्यालयातील दोन वर्ग मैत्रिणी अचानकपणे शाळेतून घरी न जाता बाहेरगावी निघून गेल्या. ही घटना १७ फेब्रुवारीला घडली. मुली वेळेत घरी न आल्याने पालकांची चिंता वाढली. इतरत्र शोध घेतला. मात्र मुली मिळून आल्या नाही. शेवटी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुलींच्या पालकांनी आपल्या मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ठाणेदार आनंद वागतकर यांना निर्देश दिले.

वागतकर यांनी स्वतंत्र शोध पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक अलका गायकवाड यांच्या नेतृत्वात शैलेष जाधव, सुधीर पुसदकर, सागर चिरडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला या मुली कळंबमध्ये असल्याची माहिती मिळाली. मात्र मुलींनी तेथेही पोलिसांना चकमा दिला. या मुली कळंबवरून कॅनॉलच्या रस्त्याने थेट बाभूळगावला पोहोचल्या. या मुलींनी यवतमाळवरून वर्धा नंतर कळंब व तेथून बाभूळगाव असा प्रवास केला. बाभूळगावमध्ये शोध पथकाने या मुलींना एका जंगल परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी त्या मुलींची महिला पोलीस अधिकारी गायकवाड यांनी समजूत काढत त्यांना यवतमाळला आणले. 

नेमक्या पळून का गेल्या याची विचारणा केली असता त्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी न झाल्याचे कारण सांगितले. यावरून मुली किती दबावात असतात हे लक्षात येते. दहावीचे वर्ष महत्वाचे असले तरी मुलांच्या मानसिकतेचा विचार करीत त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे सोईचे ठरणार आहे अन्यथा एका नव्या समस्येला पालकाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :examपरीक्षाYavatmalयवतमाळ