शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

वटफळीच्या नागरिकांना २० दिवसांपासून पाणीच नाही

By admin | Updated: August 9, 2014 23:57 IST

नेर तालुक्यातील वटफळी येथील पाण्याची मोटार जळाल्याने गेल्या २० दिवसांपासून येथील सार्वजनिक नळाला पाणीच येणे बंद झाले. त्यामुळे भरपावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

नेर : नेर तालुक्यातील वटफळी येथील पाण्याची मोटार जळाल्याने गेल्या २० दिवसांपासून येथील सार्वजनिक नळाला पाणीच येणे बंद झाले. त्यामुळे भरपावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील एका विहिरीतून सध्या नागरिक पाणी भरत असले तरीसुद्धा या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नेर तालुक्यातील वटफळी येथे झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक नळाची मोटार जळाल्यामुळे २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. ही मोटार दुरुस्तीचा खर्च पाच हजार रुपये आहे. सदर मोटार दुरुस्तीसाठी बोदेगाव येथे नेण्यात आली आहे. परंतु येथील दुरुस्ती केंद्राचा करार संपल्याने मोटार तिथेच पडून आहे. या सर्व बाबींचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. सध्या नागरिक पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका विहिरीतून पाणी आणतात. परंतु या विहिरीतील पाणी दूषित आहे. ग्रामपंचायतकडे ब्लिचिंग पावडर उपलब्ध असतानासुद्धा ते या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यास टाळाटाळ करीत आहे. याबाबत काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी गावातील विहिरीचे दूषित पाणी चक्क गटविकास अधिकाऱ्यांकडे नेले होते. गावातील नळ योजना पूर्ववत करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या गावातील झोपडपट्टीवासियांना ग्रामसेवकाने घरकुलांचे आमिष देऊन करवसुली केली. नंतर मात्र ही झोपडपट्टी बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला.येथील सध्या कर्तव्यावर असलेल्या महिला ग्रामसेवक बाहेरगावहून ये-जा करीत असल्याने गावातील विकास कामांचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यातच नागरिकांच्या जीव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अपयश येत आहे. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा आणि दिलासा द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)