शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

‘मजीप्रा’च्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देदहा दिवसांपासून नळ नाही । चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावरील टाक्यांमध्ये ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पामध्ये भरपूर पाणी असतानाही दहा-दहा दिवसपर्यंत पाणी मिळत नाही. विकतच्या आणि हातपंपाच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. शिवाय या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही समन्वयाचा अभाव दिसून येतो. नळ कधी येणार याचा दिवस आणि वेळेविषयीसुद्धा नक्की सांगितले जात नाही.चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागातील आठ दिवसांनंतरचा नवव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा या कामामुळे थांबला गेला. आठ अधिक तीन असे ११ दिवस पाणी पुरविण्याचा प्रश्न या नागरिकांपुढे आहे. सदर काम लवकरच पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले जात आहे.सिंघानियानगर परिसरातील हजारो नागरिकांना हातपंप किंवा विहिरीच्या पाण्यावर आपली गरज पूर्ण करावी लागणार आहे. पिण्यासाठी त्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था न करताच कामे काढण्याची सवयच जणू या विभागाला झाली आहे. शहराला दोन प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोनही प्रकल्पांसाठी वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी आहेत. एकमेकांच्या कामाविषयी ते कुठलीही माहिती ठेवत नसल्याची बाब पुढे आली आहे. तांत्रिक कामे सांभाळणारे अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.नळाद्वारे सांडपाणीयवतमाळ शहरात अनेक ठिकाणी नळाची पाईपलाईन लिकेज आहे. सांडपाणी वाहून जाण्याच्या नालीतून जुन्या लाईन गेलेल्या आहेत. लिकेज पाईपमध्ये शिरणारे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात जात आहे. शुद्ध पाण्याचा दावा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लोकांच्या आरोग्याविषयी काही देणेघेणे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण