शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’च्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देदहा दिवसांपासून नळ नाही । चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावरील टाक्यांमध्ये ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पामध्ये भरपूर पाणी असतानाही दहा-दहा दिवसपर्यंत पाणी मिळत नाही. विकतच्या आणि हातपंपाच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. शिवाय या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही समन्वयाचा अभाव दिसून येतो. नळ कधी येणार याचा दिवस आणि वेळेविषयीसुद्धा नक्की सांगितले जात नाही.चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागातील आठ दिवसांनंतरचा नवव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा या कामामुळे थांबला गेला. आठ अधिक तीन असे ११ दिवस पाणी पुरविण्याचा प्रश्न या नागरिकांपुढे आहे. सदर काम लवकरच पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले जात आहे.सिंघानियानगर परिसरातील हजारो नागरिकांना हातपंप किंवा विहिरीच्या पाण्यावर आपली गरज पूर्ण करावी लागणार आहे. पिण्यासाठी त्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था न करताच कामे काढण्याची सवयच जणू या विभागाला झाली आहे. शहराला दोन प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोनही प्रकल्पांसाठी वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी आहेत. एकमेकांच्या कामाविषयी ते कुठलीही माहिती ठेवत नसल्याची बाब पुढे आली आहे. तांत्रिक कामे सांभाळणारे अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.नळाद्वारे सांडपाणीयवतमाळ शहरात अनेक ठिकाणी नळाची पाईपलाईन लिकेज आहे. सांडपाणी वाहून जाण्याच्या नालीतून जुन्या लाईन गेलेल्या आहेत. लिकेज पाईपमध्ये शिरणारे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात जात आहे. शुद्ध पाण्याचा दावा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लोकांच्या आरोग्याविषयी काही देणेघेणे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण