शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना

By admin | Updated: October 8, 2014 23:33 IST

सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात

यवतमाळ : सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीमुळे होणारा त्रास असह्य आहे. प्रामुख्याने लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सदनिकांविषयी हा प्रश्न गंभीर आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात दारव्हा मार्गावर असलेल्या अनेक सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. विशेषत: एकवीरा चौकानजीकच्या सदनिका नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले आहे. मातोश्री नगराला लागून असलेल्या सदनिकेतील पाण्यामुळे तर मोठी गटारगंगा तयार झाली आहे. याठिकाणी दोन महिन्यांआधी मुरमाचे ढीग टाकून पाणी वाहने तेवढे थोपविले. आता मात्र त्या ठिकाणी तलावसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राऊतनगरात असलेल्या सदनिकेचे सांडपाणी दारव्हा मार्गाकडे जाणाऱ्या रुळालगत सोडून देण्यात आले. नागरी वस्ती असलेल्या भागात हे पाणी थोपले गेले. यापाण्यामध्ये जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो. शिवाय महावीरनगरच्या बाजूला असलेल्या काही सदनिकांच्या पाण्यानेही यामध्ये भर पडली आहे. पावसाळ्यात तर डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून सांडपाणी वाहून जात असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र जलस्रोत दूषित होतात. यापासून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच दारव्हा मार्गावर निर्माण झालेल्या एका सदनिकेलगत जुन्या सदनिकेतील सांडपाण्याचे भलेमोठे डबके तयार झाले आहे. केवळ मुरूम टाकून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून पाणी वाहते. या मार्गावरून वाहतुकीचे प्रमाण कमी असले तरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना मात्र नाकाला रूमाल लावून ये-जा करावी लागते. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही लोहारा ग्रामपंचायतीला मात्र याविषयी काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. (वार्ताहर)