शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडून बेदखल

By admin | Updated: November 8, 2015 02:30 IST

विविध प्रकारच्या समस्यांना घेऊन दाखल केलेल्या तक्रारीवर अधिकारीस्तरावरून कुठलीही कारवाई होत नाही.

उदासीनता : झिजवावे लागतात उंबरठे मोहदी : विविध प्रकारच्या समस्यांना घेऊन दाखल केलेल्या तक्रारीवर अधिकारीस्तरावरून कुठलीही कारवाई होत नाही. कित्येक दिवसपर्यंत या तक्रारी धूळ खात पडून असतात. अधिकारी सुटीवर आहे, संबंधित कर्मचारी उपस्थित नाही आदी कारणे सांगून तक्रारींच्या फाईली निकाली काढल्या जात नाही. नागरिकांना आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी कित्येक दिवस, महिने निघून जातात. काही तक्रारीवर तर विचारही केला जात नाही. तक्रार निवारण दिन नावाला असल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांनी कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित रहावे, असे युती शासनाच्या काळात बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे आठवड्यातील किमान दोन दिवस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर मांडून निराकरण करून घेणे शक्य होते. पुढे आघाडी सरकारच्या काळात ही पद्धत जवळपास थांबली. त्यामुळे नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयात संबंधित विभाग प्रमुखांंना भेटण्यासाठी चकरा होतात. यात त्यांचा पैसा, वेळ, श्रम खर्ची पडतात. विविध कार्यालयांमध्ये अडचणी, समस्यांबाबतचे अर्ज नागरिक देतात. पण त्याची पोहोच देताना स्वाक्षरी अस्पष्ट केली जाते. संबंधित विभागाचा शिक्का त्यावर लावून पोेच देणे अपेक्षित असताना या बाबीला फाटा देण्यात येतो. तक्रारीवर काय झाले, काय कारवाई होणार, कधी होणार आदींबाबत संबंधित विभागाकडून कळविले जात नाही. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, वीज वितरण, आरोग्य आदी ठिकाणी तक्रार निवारण दिन साजरा केला जातो. मात्र या विषयीची माहिती लोकांपर्यंत योग्य त्यावेळी पोहोचत नाही. महसूल आणि पंचायत विभागाबाबत हा प्रकार प्रामुख्याने आढळून येतो. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागात लागू झाली आहे. कोणते काम किती दिवसात होईल याचा उल्लेख या सनदमध्ये आहे. मात्र ही सनद कागदोपत्रीच ठरल्याचे नागरिकांना अनुभवास येत आहे. विविध महत्वपूर्ण विभागाचे टोल फ्री आणि हेल्पलाईन क्रमांकावर माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. संबंधित विभागाच्या प्रमुखांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कागदपत्र मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. (वार्ताहर)