शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नागरिकांच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडून बेदखल

By admin | Updated: November 8, 2015 02:30 IST

विविध प्रकारच्या समस्यांना घेऊन दाखल केलेल्या तक्रारीवर अधिकारीस्तरावरून कुठलीही कारवाई होत नाही.

उदासीनता : झिजवावे लागतात उंबरठे मोहदी : विविध प्रकारच्या समस्यांना घेऊन दाखल केलेल्या तक्रारीवर अधिकारीस्तरावरून कुठलीही कारवाई होत नाही. कित्येक दिवसपर्यंत या तक्रारी धूळ खात पडून असतात. अधिकारी सुटीवर आहे, संबंधित कर्मचारी उपस्थित नाही आदी कारणे सांगून तक्रारींच्या फाईली निकाली काढल्या जात नाही. नागरिकांना आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी कित्येक दिवस, महिने निघून जातात. काही तक्रारीवर तर विचारही केला जात नाही. तक्रार निवारण दिन नावाला असल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांनी कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित रहावे, असे युती शासनाच्या काळात बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे आठवड्यातील किमान दोन दिवस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर मांडून निराकरण करून घेणे शक्य होते. पुढे आघाडी सरकारच्या काळात ही पद्धत जवळपास थांबली. त्यामुळे नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयात संबंधित विभाग प्रमुखांंना भेटण्यासाठी चकरा होतात. यात त्यांचा पैसा, वेळ, श्रम खर्ची पडतात. विविध कार्यालयांमध्ये अडचणी, समस्यांबाबतचे अर्ज नागरिक देतात. पण त्याची पोहोच देताना स्वाक्षरी अस्पष्ट केली जाते. संबंधित विभागाचा शिक्का त्यावर लावून पोेच देणे अपेक्षित असताना या बाबीला फाटा देण्यात येतो. तक्रारीवर काय झाले, काय कारवाई होणार, कधी होणार आदींबाबत संबंधित विभागाकडून कळविले जात नाही. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, वीज वितरण, आरोग्य आदी ठिकाणी तक्रार निवारण दिन साजरा केला जातो. मात्र या विषयीची माहिती लोकांपर्यंत योग्य त्यावेळी पोहोचत नाही. महसूल आणि पंचायत विभागाबाबत हा प्रकार प्रामुख्याने आढळून येतो. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागात लागू झाली आहे. कोणते काम किती दिवसात होईल याचा उल्लेख या सनदमध्ये आहे. मात्र ही सनद कागदोपत्रीच ठरल्याचे नागरिकांना अनुभवास येत आहे. विविध महत्वपूर्ण विभागाचे टोल फ्री आणि हेल्पलाईन क्रमांकावर माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. संबंधित विभागाच्या प्रमुखांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कागदपत्र मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. (वार्ताहर)