शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर

By admin | Updated: July 23, 2016 00:26 IST

तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर ओढवले आहे.

शासनाची उदासीनता : पर्यावरण विभागाच्या जाचक अटीमुळे अवकळा वणी : तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर ओढवले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक निकषांमुळे या उद्योगावर अवकळा आली आहे. परिणामी चुना भट्टी व गिट्टी खाणीत काम करणाऱ्यांवर संकट ओढवले आहे. तालुक्यात राजूरची (कॉलरी) ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख आहे. या गावात ब्रिटीशांच्या काळातच चुना उद्योगाने बाळसे धरले होते. या चुना उद्योगात काम करणारे कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून राजूर येथे दाखल झाले आहे. त्यापैकी अनेक कामगार तेथेच कायमस्वरूपी स्थायीक झाले आहेत. तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राजूर हे गाव आहे़ या गावात देशाच्या अनेक प्रांतातील नागरिक वास्तव्य करतात. त्यात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम आदी राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळेच या गावाला आता ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. राजूर येथे ब्रिटीश काळापासून चुना तयार करणाऱ्या जवळपास ३० ते ४० चुना भट्ट्या होत्या. चुना तयार करण्यासाठी लागणाऱ्या डोलोमाईट व लाईम स्टोन, या कच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या जवळपास १५ खाणीही तेथे होत्या.त्यापैकी आता केवळ चुना तयार करणारे सात ते आठ चुना भट्टे व दोन ते तीन गिट्टीच्या खाणीच तेवढ्या सुरू आहे. उर्वरित सर्व चुना भट्ट्या आणि डोलोमाईटच्या खाणी ठप्प पडल्या आहेत. चुन्यासाटी लागणारा कच्चा माल डोलोमाईट, लाईम स्टोनच्या खाणींवर पर्यावरण विभागाने अनेक नियम लादले आहे. त्यात जाचक अटी आहेत. लघु उद्योग असलेल्या डोलोमाईट आणि लाईम स्टोन खाणींना आता मोठ्या उद्योगांच्या अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्या अटी, शर्तीची पूर्तता करणे कठीण झालयाने चुना तयार करणारे लघु उद्योजक संकटात सापडले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक अटी व शर्तींमुळे चुना उद्योगाला कच्चा माल पुरविणाऱ्या लाईम स्टोन व डोलोमाईटच्या जवळपास १० ते १२ खाणी सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या खाणींमध्ये काम करणारे सर्वच कामगार बेरोजगार झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. सोबतच शासनाच्या गौण खनिज कराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी) मजूर सापडले संकटात चुना तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने लघु उद्योजकांवर चुना भट्टे बंद करण्याची वेळ ओढवली. परिणामी डोलोमाईट व चुना भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांनाही आता काम मिळेनासे झाले आहे. ते बेरोजगार होत आहेत. त्यांचे कुटुंबच संकटात सापडले आहे. रोजगार नसल्याने संसाराचा गाडा हाकणे त्यांना कठीण झाले आहे.