शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

वणीतील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर

By admin | Updated: July 23, 2016 00:26 IST

तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर ओढवले आहे.

शासनाची उदासीनता : पर्यावरण विभागाच्या जाचक अटीमुळे अवकळा वणी : तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर ओढवले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक निकषांमुळे या उद्योगावर अवकळा आली आहे. परिणामी चुना भट्टी व गिट्टी खाणीत काम करणाऱ्यांवर संकट ओढवले आहे. तालुक्यात राजूरची (कॉलरी) ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख आहे. या गावात ब्रिटीशांच्या काळातच चुना उद्योगाने बाळसे धरले होते. या चुना उद्योगात काम करणारे कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून राजूर येथे दाखल झाले आहे. त्यापैकी अनेक कामगार तेथेच कायमस्वरूपी स्थायीक झाले आहेत. तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राजूर हे गाव आहे़ या गावात देशाच्या अनेक प्रांतातील नागरिक वास्तव्य करतात. त्यात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम आदी राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळेच या गावाला आता ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. राजूर येथे ब्रिटीश काळापासून चुना तयार करणाऱ्या जवळपास ३० ते ४० चुना भट्ट्या होत्या. चुना तयार करण्यासाठी लागणाऱ्या डोलोमाईट व लाईम स्टोन, या कच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या जवळपास १५ खाणीही तेथे होत्या.त्यापैकी आता केवळ चुना तयार करणारे सात ते आठ चुना भट्टे व दोन ते तीन गिट्टीच्या खाणीच तेवढ्या सुरू आहे. उर्वरित सर्व चुना भट्ट्या आणि डोलोमाईटच्या खाणी ठप्प पडल्या आहेत. चुन्यासाटी लागणारा कच्चा माल डोलोमाईट, लाईम स्टोनच्या खाणींवर पर्यावरण विभागाने अनेक नियम लादले आहे. त्यात जाचक अटी आहेत. लघु उद्योग असलेल्या डोलोमाईट आणि लाईम स्टोन खाणींना आता मोठ्या उद्योगांच्या अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्या अटी, शर्तीची पूर्तता करणे कठीण झालयाने चुना तयार करणारे लघु उद्योजक संकटात सापडले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक अटी व शर्तींमुळे चुना उद्योगाला कच्चा माल पुरविणाऱ्या लाईम स्टोन व डोलोमाईटच्या जवळपास १० ते १२ खाणी सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या खाणींमध्ये काम करणारे सर्वच कामगार बेरोजगार झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. सोबतच शासनाच्या गौण खनिज कराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी) मजूर सापडले संकटात चुना तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने लघु उद्योजकांवर चुना भट्टे बंद करण्याची वेळ ओढवली. परिणामी डोलोमाईट व चुना भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांनाही आता काम मिळेनासे झाले आहे. ते बेरोजगार होत आहेत. त्यांचे कुटुंबच संकटात सापडले आहे. रोजगार नसल्याने संसाराचा गाडा हाकणे त्यांना कठीण झाले आहे.