शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वीज अभियंत्यांना घेराव

By admin | Updated: June 28, 2017 00:35 IST

मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी मंगळवारी विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर

विजेचा लपंडाव : दोन महिन्यांपासून खेळखंडोबा, आर्णीत तीन तास ठिय्या लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी मंगळवारी विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर धडक देवून तब्बल तीन तास वीज अभियंत्यांना घेराव घातला. सुकळीसह देऊरवाडी, पाभळ, पिंपळनेर, बोरगाव दाभडी, चिकणी येथील ग्रामस्थांनी आपला राग व्यक्त केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहे. पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही समस्या विद्युत कंपनीच्या संबंधितांकडे वारंवार मांडूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंता पी.बी. मोहोकार यांना घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, पंचायत समिती सदस्य रवी राठोड, सुकळीचे सरपंच सुभाष जाधव, नगरसेवक चिराग शहा आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. पाभळ येथील दिलीप राठोड, पिंपळनेरचे सरपंच प्रमोद आडे यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या गावातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग यांनी विद्युत कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क केला. सदर गावातील विजेची समस्या तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले. उपकार्यकारी अभियंता मोहोकार यांनीही अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क करून प्रश्न मांडला. यानंतर आर्णी शहरासह सुकळी व परिसरातील वीज पुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.