शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

शासकीय शाळांचे हरविले बालपण

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

एकेकाळी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी आणि बुद्धीमान विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांना अवकळा आली. शासकीय योजनांची प्रयोगशाळा झालेल्या या शाळांचेच बालपण

यवतमाळ : एकेकाळी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी आणि बुद्धीमान विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांना अवकळा आली. शासकीय योजनांची प्रयोगशाळा झालेल्या या शाळांचेच बालपण जणू हरविले आहे. विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि कडक शिस्तीचे शिक्षकही आता दिसत नाही. २५-३० वर्षापूर्वी ग्रामीण भागात शिक्षण म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आणि शहरात नगरपरिषदेची शाळा असेच समीकरण होते. कितीही श्रीमंत असो की गरीब असो. सर्वांचीच मुले एकाच शाळेत शिकायची. याच शाळांनी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नागरिक घडविले. मोठ्या पदावर असलेल्या अनेकांना आजही आपल्या प्राथमिक शाळेचा अभिमान आहे. मात्र अलिकडच्या काळात शासकीय धोरणात जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळांची अवस्था वाईट होत चालली आहे. केवळ गरिबांची शाळा अशी बिरुदावली या शाळांना लावली जात आहे. गावाकडील टुमदार कौलारु शाळा शष्टकोणी झाल्या. परंतु या शाळांमध्ये खिचडीचा भटार खाना आला. गुरुजीही गावाऐवजी शहराकडे धाव घेऊ लागले. शाळांची पटसंख्या घसरायला लागली. मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन अशा सुविधा असतानाही जिल्हा परिषद किंवा नगरपरिषद शाळेत शिकलेले पालकच आता या शाळांना नाक मुरुड लागली आहे. सर्वांचा धावा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे दिसत आहे. बालमनांना आकार देणाऱ्या आणि त्यांच्या उज्वल भविष्याच्या साक्षीदार असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद शाळा आता केवळ गोरगरिबांच्या मुलांसाठीच आहे काय अशी स्थिती निर्माण झाली. या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर या शाळांचे बालपण हरवून गेल्याशिवाय राहणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)