शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

इसापूरच्या बालिकेचा जळगावात बालविवाहाचा घाट उधळला

By अविनाश साबापुरे | Updated: June 11, 2023 15:47 IST

बालसंरक्षण कक्षाची धडक कारवाई : नातेवाईकांचा घेतला लेखी जबाब

यवतमाळ : जिल्ह्यातील केवळ १४ वर्षे वय असलेल्या बालिकेचा जळगावातील व्यक्तीशी बालविवाह लावून देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र याची भणक लागताच बालसंरक्षण कक्षाच्या पथकाने मुलीच्या घरी धडक देत आठवडाभरापूर्वीच हा डाव उधळून लावला.

दिग्रस तालुक्यातील इसापूर गावातील १४ वर्षीय बालिकेचा विवाह पुढच्या आठवड्यात जळगाव येथे नियोजित होता. त्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली. त्या आधारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व गावपातळीवरील बालसंरक्षण समितीने तातडीने कारवाई केली. होणारा बालविवाह वेळीच रोखला. मुलीला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याबाबत कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. तसेच मुलीच्या घरी भेट देऊन मुलीच्या कुटुंबास व इतर नातेवाईकांना समज देण्यात आली. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर असा विवाह हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे वय १८ वर्षे झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा लेखी जबाब उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिला. बालिकेला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात येणार आहे. यावेळी महिला व बालविकास विभागाकडून गावातील जबाबदार व्यक्तींना बालविवाहाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

सदर कारवाई जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, दिग्रसचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव, चाईल्ड लाईनचे गणेश आत्राम व पूजा शेलारे, ग्रामसेवक डी. ए. इंगळे, सरपंच गजानन गावंडे, पोलीस पाटील ओम खोडे, अंगणवाडी सेविका रंजना जाधव, आशासेविका वर्षा मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याकरिता दिग्रसचे पोलिस निरीक्षक सोनुने यांचे विशेष सहकार्य लाभले. 

नागरिकांनी बालविवाहाबाबत सतर्क राहावे. बालविवाहाबाबत माहिती असल्यास त्वरित चाइल्ड लाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकवर माहिती द्यावी. नाव गोपनीय ठेवले जाईल.- प्रशांत थोरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ