शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बाळ अपहरणाने सुरक्षेची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:22 IST

येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याने ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देग्रामीण रूग्णालय : प्रभार न देता अधीक्षक रजेवर, सीसीटीव्ही कॅमेरे बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याने ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून याविषयी संताप व्यक्त होत आहे. अता या घटनेनंतर प्रशासन कोणते पाऊल उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.येथील ग्रामीण रूग्णालयाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. शहराच्या ५० हजार गोरगरिब नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणारे ग्रामीण रूग्णालयच आजारी झाले आहे. ही बाब येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा वैद्यकीय अधीक्षक व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र प्रशासनने ही बाबच गंभीरतेने न घेतल्याने आज दवाखान्यातून बाळाचे अपहरण करण्यापर्यंत असामाजिक घटकांची मजल गेली आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. शासन महिलेची प्रसुती दवाखान्यातच करण्याचा आग्रह धरतात. मात्र त्याची सोय करून देण्याची जबाबदारी कोणी घेत नाही.येथील अस्वच्छता कळसाला पोहोचली आहे. त्यामुळे या रुग्णालयात उपाचार घेणाºया रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नसल्याने रूग्णांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. सुरक्षा तर जणू वेशीवर टांगली आहे. या रुग्णालयात सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाही. घटनेच्या रात्री प्रसुती वॉर्डाचे दार रात्रभर सताड उघडे होते. रात्री रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. हे कर्मचारीही रूग्णांना मोकाट सोडून झोपा घेत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.दवाखान्यातील सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विविध वॉर्डात व परिसरातील नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र या कॅमेºयामध्ये दृश्य साठवून ठेवले जात नाही. जेव्हा बाळाच्या अपहरणाची घटना घडली. त्यावेळी कॅमेºयाची तपासणी केली असता, त्यामधील हार्डडीस्क गायब असल्याचे निदर्शनास आले.मनसेच्या निवेदनाला प्रशासनाकडून केराची टोपलीयेथील ग्रामीण रूग्णालयातील असुविधेबाबत मनसेने ८ नोव्हेंबरलाच वैद्यकीय अधिकाºयांना निवेदन देऊन सतर्क केले होते. यापूर्वीही अनेकदा मनसेने निवेदने दिली. मात्र आरोग्य विभागाने ग्रामीण रूग्णालयातील कारभार सुधारण्याकडे लक्षच दिले नाही. आता तर आमच्यावर केसेस झाल्या तरी चालेल पण रूग्णालयाची व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा रूग्ण सेवा केंद्राचे अध्यक्ष धनंजय त्रिंबके यांनी दिला आहे.