शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चिखलवर्धा गावाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:30 IST

गावात जानेवारीमध्ये निवडणूक झाली. नंतर वर्षा कनाके यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाची निवड होऊन आता जवळपास तीन महिने ...

गावात जानेवारीमध्ये निवडणूक झाली. नंतर वर्षा कनाके यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाची निवड होऊन आता जवळपास तीन महिने उलटले. सचिवांनी मासिक बैठक घेतली व सर्व खाते बदल करण्याचे ठरविले. परंतु अद्याप एकही खाते बदल करण्यात आले नाही, असा कनाके यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी आता सचिवांच्या भोंगळ कारभाराविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

गावात ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य कामे होत आहे. सरपंचांना विश्वासात घेऊन काम करण्यात आले नाही. चिलखवर्धा ग्रामपंचायतअंतर्गत गवरधड, गोविंदपूर, धनगर (बेडा) यांचा समावेश आहे. तेथे भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. मात्र, ग्रामसेवकांना मागील पंचवार्षिक प्राप्त निधी व खर्च निधीची माहिती विचारली असता दिली जात नाही. ते गावात नियमित येत नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही चौकशी होत नाही. त्यामुळे सरपंच हतबल झाल्या आहे. गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरपंचांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती सभापती यांनी गावाला भेट देऊन समस्या सोडवण्यास मदत करावी, अशी विनंती सरपंच वर्षा कनाके यांनी केली आहे.