शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मुख्यमंत्री साहेब, कळंबचा पाणीप्रश्न निकाली काढा!

By admin | Updated: December 29, 2016 00:25 IST

शहराला गेली अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीतील नळयोजना कुचकामी ठरली आहे.

गजानन अक्कलवार   कळंब शहराला गेली अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीतील नळयोजना कुचकामी ठरली आहे. नव्याने नगरपंचायत झालेल्या कळंब शहराची तहान भागविण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. गुरुवार, २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यादृष्टीने येथे काही घोषणा करतील, अशी आशाही त्यांना आहे. राळेगाव मतदारसंघात आजच्या स्थितीत एकही उद्योग कार्यान्वित नाही. शेतमालावर आधारित प्रकल्प नाही. सिंचनाची पर्याप्त सोय नाही. बेंबळाचे पाणी सिंचनासाठी बरोबर मिळत नाही. शेतातील विजेचा प्रश्न पाचवीला पुजलेला आहे. एमआयडीसी ओस पडलेली आहे. तेथे उद्योग उभारण्यासाठी कोणी प्रयत्न केलेला नाही. बेंबळाची कामे निकृष्ट करून ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी गब्बर झाले. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कळंब ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. परंतु सुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे. अनेक वर्षांपासून क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले नाही. बेंबळा प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत. गावांतर्गत रस्ते बांधून प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याची आवश्यकता आहे. ढिसाळ आरोग्य यंत्रणेला ‘रोगमुक्त’ करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारांना रोजगार, गाव तेथे बसची व्यवस्था, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना या विषयावर गांभीर्याने काम होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात जनतेच्या अपेक्षेस पात्र कामगिरी आमदार डॉ. अशोक उईके यांनी बजावल्यास त्यांच्या राजकीय भविष्याचा आलेख चढता राहणार आहे. परंतु यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ताकद’ द्यावी, अशीही जनतेची मागणी आहे. वीस वर्षांपासून राळेगाव मतदारसंघाचा अपेक्षित व गतिमान विकास झालेला नाही. येणाऱ्या काळात विकासाची गती वाढावी, यासाठी मतदारांनी परिवर्तन घडविले. आता आमदार डॉ.अशोक उईके विकासाचे आव्हान घेऊन उभे ठाकले आहे. त्यांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांचीही साथ हवी आहे. आमदारांना हवी आता ‘सीएम’ची साथ कळंबच्या इतिहासात शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री बहुदा पहिल्यांदाच येत आहे. यात आमदार डॉ.अशोक उईके यांचा पुढाकार आहे. त्यामुळे कळंबसह राळेगाव मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक नागरिकांसाठी काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार डॉ.अशोक उईके यांनी कळंब येथे जलशुध्दीकरणासह नळयोजनेसाठी परिश्रम चालविले आहे. परंतु ही योजना लालफितशाहीत अडकली आहे. या योजनेला खुद्द मुख्यमंत्र्यानीच ‘पूश’ करण्याची गरज व्यक्त होत आहे.