शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मुख्यमंत्री साहेब, कळंबचा पाणीप्रश्न निकाली काढा!

By admin | Updated: December 29, 2016 00:25 IST

शहराला गेली अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीतील नळयोजना कुचकामी ठरली आहे.

गजानन अक्कलवार   कळंब शहराला गेली अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीतील नळयोजना कुचकामी ठरली आहे. नव्याने नगरपंचायत झालेल्या कळंब शहराची तहान भागविण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. गुरुवार, २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यादृष्टीने येथे काही घोषणा करतील, अशी आशाही त्यांना आहे. राळेगाव मतदारसंघात आजच्या स्थितीत एकही उद्योग कार्यान्वित नाही. शेतमालावर आधारित प्रकल्प नाही. सिंचनाची पर्याप्त सोय नाही. बेंबळाचे पाणी सिंचनासाठी बरोबर मिळत नाही. शेतातील विजेचा प्रश्न पाचवीला पुजलेला आहे. एमआयडीसी ओस पडलेली आहे. तेथे उद्योग उभारण्यासाठी कोणी प्रयत्न केलेला नाही. बेंबळाची कामे निकृष्ट करून ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी गब्बर झाले. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कळंब ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. परंतु सुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे. अनेक वर्षांपासून क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले नाही. बेंबळा प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत. गावांतर्गत रस्ते बांधून प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याची आवश्यकता आहे. ढिसाळ आरोग्य यंत्रणेला ‘रोगमुक्त’ करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारांना रोजगार, गाव तेथे बसची व्यवस्था, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना या विषयावर गांभीर्याने काम होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात जनतेच्या अपेक्षेस पात्र कामगिरी आमदार डॉ. अशोक उईके यांनी बजावल्यास त्यांच्या राजकीय भविष्याचा आलेख चढता राहणार आहे. परंतु यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ताकद’ द्यावी, अशीही जनतेची मागणी आहे. वीस वर्षांपासून राळेगाव मतदारसंघाचा अपेक्षित व गतिमान विकास झालेला नाही. येणाऱ्या काळात विकासाची गती वाढावी, यासाठी मतदारांनी परिवर्तन घडविले. आता आमदार डॉ.अशोक उईके विकासाचे आव्हान घेऊन उभे ठाकले आहे. त्यांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांचीही साथ हवी आहे. आमदारांना हवी आता ‘सीएम’ची साथ कळंबच्या इतिहासात शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री बहुदा पहिल्यांदाच येत आहे. यात आमदार डॉ.अशोक उईके यांचा पुढाकार आहे. त्यामुळे कळंबसह राळेगाव मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक नागरिकांसाठी काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार डॉ.अशोक उईके यांनी कळंब येथे जलशुध्दीकरणासह नळयोजनेसाठी परिश्रम चालविले आहे. परंतु ही योजना लालफितशाहीत अडकली आहे. या योजनेला खुद्द मुख्यमंत्र्यानीच ‘पूश’ करण्याची गरज व्यक्त होत आहे.