शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मुख्यमंत्र्यांनी नैतिक अधिकार गमावला

By admin | Updated: May 6, 2017 00:20 IST

विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना तीन हजार ११७ कोटी ५४ लाख रुपये अद्यापही शासनाने दिलेले नाही.

लोकजागृती मंच : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोध करण्याचा इशारा वार्ताहर। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना तीन हजार ११७ कोटी ५४ लाख रुपये अद्यापही शासनाने दिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विदर्भात पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही. तरीही ते येत असतील तर विरोध केल्या जाईल, असा इशारा लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी दिला आहे. ६ मे रोजी मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०५३ गावांपैकी २०५१ दुष्काळी गावांना अद्यापही मदत मिळाली नाही. ही रक्कम जवळपास ५०० कोटी रुपयांच्यावर आहे. दोन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ८०० रुपये मदत देण्याचे सरकारचे धोरण आहे. न्यायालयातील शपथपत्रानुसार ही रक्कम ३१ मार्च २०१७ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सर्व विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या सारखे दुर्दैव कोणते, असा प्रश्नही मंचाने उपस्थित केला आहे. खरीप २०१५ मधील पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखवून जिल्ह्यातील २०५१ गावातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव प्रशासनाने आखला होता. यासंदर्भात मंचने वारंवार उठाव करून ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आणण्यासाठी प्रशासनास भाग पाडले. तेव्हाही शासनाने दुष्काळी मदत देण्याचे टाळले. या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. आर्थिक मदत देण्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. तूर खरेदीतही असाच घोळ सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांसाठी सभा उधळण्याचा इशाराही मंचचे देवानंद पवार यांनी दिला आहे. (वार्ताहर)