शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुख्यमंत्र्यांनी नैतिक अधिकार गमावला

By admin | Updated: May 6, 2017 00:20 IST

विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना तीन हजार ११७ कोटी ५४ लाख रुपये अद्यापही शासनाने दिलेले नाही.

लोकजागृती मंच : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोध करण्याचा इशारा वार्ताहर। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना तीन हजार ११७ कोटी ५४ लाख रुपये अद्यापही शासनाने दिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विदर्भात पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही. तरीही ते येत असतील तर विरोध केल्या जाईल, असा इशारा लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी दिला आहे. ६ मे रोजी मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०५३ गावांपैकी २०५१ दुष्काळी गावांना अद्यापही मदत मिळाली नाही. ही रक्कम जवळपास ५०० कोटी रुपयांच्यावर आहे. दोन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ८०० रुपये मदत देण्याचे सरकारचे धोरण आहे. न्यायालयातील शपथपत्रानुसार ही रक्कम ३१ मार्च २०१७ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सर्व विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या सारखे दुर्दैव कोणते, असा प्रश्नही मंचाने उपस्थित केला आहे. खरीप २०१५ मधील पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखवून जिल्ह्यातील २०५१ गावातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव प्रशासनाने आखला होता. यासंदर्भात मंचने वारंवार उठाव करून ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आणण्यासाठी प्रशासनास भाग पाडले. तेव्हाही शासनाने दुष्काळी मदत देण्याचे टाळले. या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. आर्थिक मदत देण्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. तूर खरेदीतही असाच घोळ सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांसाठी सभा उधळण्याचा इशाराही मंचचे देवानंद पवार यांनी दिला आहे. (वार्ताहर)