शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी नैतिक अधिकार गमावला

By admin | Updated: May 6, 2017 00:20 IST

विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना तीन हजार ११७ कोटी ५४ लाख रुपये अद्यापही शासनाने दिलेले नाही.

लोकजागृती मंच : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोध करण्याचा इशारा वार्ताहर। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना तीन हजार ११७ कोटी ५४ लाख रुपये अद्यापही शासनाने दिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विदर्भात पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही. तरीही ते येत असतील तर विरोध केल्या जाईल, असा इशारा लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी दिला आहे. ६ मे रोजी मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०५३ गावांपैकी २०५१ दुष्काळी गावांना अद्यापही मदत मिळाली नाही. ही रक्कम जवळपास ५०० कोटी रुपयांच्यावर आहे. दोन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ८०० रुपये मदत देण्याचे सरकारचे धोरण आहे. न्यायालयातील शपथपत्रानुसार ही रक्कम ३१ मार्च २०१७ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सर्व विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या सारखे दुर्दैव कोणते, असा प्रश्नही मंचाने उपस्थित केला आहे. खरीप २०१५ मधील पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखवून जिल्ह्यातील २०५१ गावातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव प्रशासनाने आखला होता. यासंदर्भात मंचने वारंवार उठाव करून ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आणण्यासाठी प्रशासनास भाग पाडले. तेव्हाही शासनाने दुष्काळी मदत देण्याचे टाळले. या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. आर्थिक मदत देण्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. तूर खरेदीतही असाच घोळ सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांसाठी सभा उधळण्याचा इशाराही मंचचे देवानंद पवार यांनी दिला आहे. (वार्ताहर)