शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

शिक्षकांच्या फेरबदलीने सीईओ पेचात

By admin | Updated: June 25, 2016 02:24 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्यानंतर नव्याने बदली प्रक्रिया राबविण्याचा आदेश गुरुवारी रात्री ई-मेलवर पोहोचला.

बदल्यांचे कवित्व : एका दिवसात कशा करायच्या बदल्या?यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्यानंतर नव्याने बदली प्रक्रिया राबविण्याचा आदेश गुरुवारी रात्री ई-मेलवर पोहोचला. ग्रामविकास विभागाच्या सचिवांचे पत्र प्राप्त झाल्याचे कळताच शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. तर केवळ एका दिवसात बदली प्रक्रिया कशी राबवावी, हा प्रश्न सीईओंसाठी डोकेदुखी बनला. मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यावर आक्षेप घेत काही शिक्षक नेत्यांनी ग्रामविकास मंत्रालयातून बदली प्रक्रियेवर स्टे मिळविला. विभागीय आयुक्तांच्या चमूने जिल्हा परिषद गाठून दोन दिवस चौकशी केली. हा चौकशी अहवाल ७ जून रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यापर्यंत पोहोचला. ग्रामविकास मंत्र्यांनी २३ जून रोजी विभागीय आयुक्तांचा अहवाल ग्राह्य धरून नव्याने बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. ग्रामविकास विभागाचे सचिव संजय कुडवे यांनी गुरुवारी रात्रीच ९ वाजताच्या सुमारास सीईओंच्या ई-मेलवर फेरबदली करण्याचे पत्र पाठविले. बदलीची पुनर्प्रक्रिया राबविली जाणार हे काहीसे अपेक्षितच होते. परंतु केवळ एका दिवसात म्हणजे २५ जूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करण्याचे या पत्रात म्हटले आहे. संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात कशी पूर्ण होणार, असा पेच सीईओंपुढे निर्माण झाला आहे. सुमारे २०० शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेऊन बदली प्रक्रिया खरोखरच पुन्हा होणार आहे का? याची खातरजमा करून घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे यांची भेट घेण्यात आली. एका दिवसात प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले. त्यावेळी बदल्यांसाठी मुदतवाढीची मागणी ग्रामविकास मंत्रालयाकडे करावी, त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवावे, अशी अपेक्षा बदली समर्थक शिक्षकांनी व्यक्त केली. आमदार मनोहरराव नाईक यांचीही भेट घेतली. मुदतवाढीला त्यांनीही समर्थन दर्शविले. जिल्हा परिषद अध्यक्ष फुपाटे यांनी ३१ जुलैपर्यंत बदल्यांसाठी मुदतवाढ मागणी पत्र ग्रामविकास विभागाला पाठविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)