शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या छात्रतेजानेच भारत सुरक्षित

By admin | Updated: March 16, 2017 00:59 IST

भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. सैन्यबल व संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या संस्कृतीने भक्कम योगदान दिले आहे.

मणिंदरजितसिंह बिट्टा : केवळ भारत माता की जय म्हणणे म्हणजे देशभक्ती नव्हे यवतमाळ : भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. सैन्यबल व संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या संस्कृतीने भक्कम योगदान दिले आहे. या भूमित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा महान राजा जन्माला आला. त्यांनी पेरलेले छत्रतेजाचे बिज आजही येथील संस्कृतीकडून जोपासले जात आहे. यामुळेच भारत सर्वच बाजूंनी सुरक्षित आहे. यापुढेही देशाला भक्कम बनविण्यासाठी महाराष्ट्रातील त्या संस्कृतीचा वसा अनंत काळ टिकविण्याचे आवाहन जिंदा शहीद मनींदरजीतसिंह बिट्टा यांनी केले. मनिंदरजीतसिंह बिट्टा यवतमाळात आले असताना ते ‘लोकमत’शी चर्चा करीत होते. आजच्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर त्यांनी सडकून टीका केली. वंदे मात्रम म्हणणे, तिरंगा ध्वज लावणे, फडकविणे, भारत माता की जय म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रभक्तीचा राजकारण्यांकडून चुकीचा वापर केला जात आहे. एकप्रकारे सामान्य भारतीयांना या माध्यमातून भ्रमित करून सत्ता स्थापनेसाठी वापरले जात आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातून केवळ राष्ट्रभक्तीच्या नावावर सत्ताच स्थापन केली, हे अतिशय चूक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राला योग्य उत्तर देण्यात आले. सर्जिकल स्ट्राईकमध्ये शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून सैनिकांनी ४५ जवानांना ठार केले. या भूमिकेचे समर्थन करण्याऐवजी उलट प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारून एक प्रकारे आतंकवादाचे समर्थन करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र हे सर्वोच्चस्थानी आहे. राष्ट्रामुळे शरीर बनले आहे. या राष्ट्रासाठी एक दिवस नाही, तर एक महिनाही उपाशी राहण्याची तयारी असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. सैन्यदलातील अंतर्गत बाबी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर काढणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रांच्या हाती लागले, तर त्याचा देशाला धोका निर्माण होऊ शकतो. शत्रू राष्ट्र त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे सैनिकांनीही तक्रारी करण्याच्या सनदशीर आयुधाचा वापर करावा. कदापि राष्ट्रहिताच्या आड येईल अशी गोष्ट करू नये, असे मनिंदरजीतसिंह बिट्टा यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)