शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या छात्रतेजानेच भारत सुरक्षित

By admin | Updated: March 16, 2017 00:59 IST

भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. सैन्यबल व संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या संस्कृतीने भक्कम योगदान दिले आहे.

मणिंदरजितसिंह बिट्टा : केवळ भारत माता की जय म्हणणे म्हणजे देशभक्ती नव्हे यवतमाळ : भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. सैन्यबल व संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या संस्कृतीने भक्कम योगदान दिले आहे. या भूमित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा महान राजा जन्माला आला. त्यांनी पेरलेले छत्रतेजाचे बिज आजही येथील संस्कृतीकडून जोपासले जात आहे. यामुळेच भारत सर्वच बाजूंनी सुरक्षित आहे. यापुढेही देशाला भक्कम बनविण्यासाठी महाराष्ट्रातील त्या संस्कृतीचा वसा अनंत काळ टिकविण्याचे आवाहन जिंदा शहीद मनींदरजीतसिंह बिट्टा यांनी केले. मनिंदरजीतसिंह बिट्टा यवतमाळात आले असताना ते ‘लोकमत’शी चर्चा करीत होते. आजच्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर त्यांनी सडकून टीका केली. वंदे मात्रम म्हणणे, तिरंगा ध्वज लावणे, फडकविणे, भारत माता की जय म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रभक्तीचा राजकारण्यांकडून चुकीचा वापर केला जात आहे. एकप्रकारे सामान्य भारतीयांना या माध्यमातून भ्रमित करून सत्ता स्थापनेसाठी वापरले जात आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातून केवळ राष्ट्रभक्तीच्या नावावर सत्ताच स्थापन केली, हे अतिशय चूक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राला योग्य उत्तर देण्यात आले. सर्जिकल स्ट्राईकमध्ये शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून सैनिकांनी ४५ जवानांना ठार केले. या भूमिकेचे समर्थन करण्याऐवजी उलट प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारून एक प्रकारे आतंकवादाचे समर्थन करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र हे सर्वोच्चस्थानी आहे. राष्ट्रामुळे शरीर बनले आहे. या राष्ट्रासाठी एक दिवस नाही, तर एक महिनाही उपाशी राहण्याची तयारी असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. सैन्यदलातील अंतर्गत बाबी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर काढणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रांच्या हाती लागले, तर त्याचा देशाला धोका निर्माण होऊ शकतो. शत्रू राष्ट्र त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे सैनिकांनीही तक्रारी करण्याच्या सनदशीर आयुधाचा वापर करावा. कदापि राष्ट्रहिताच्या आड येईल अशी गोष्ट करू नये, असे मनिंदरजीतसिंह बिट्टा यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)