शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘एसटी’तील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

By admin | Updated: July 2, 2015 02:54 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने पुढे येत आहेत.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने पुढे येत आहेत. कर्मचाऱ्यांचा गलथानपणा महामंडळाच्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे लेखा शाखेतील लेखापालावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाईचाही बडगा उगारला जातो. परंतु प्रशासनात सुरू असलेला घोळ दुर्लक्षित असल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते. रजेच्या चुकीच्या नोंदी घेणे, रजापुस्तिका कित्येक महिने अडवून ठेवणे, सेवापुस्तिकेच्या तपासणीत दिरंगाई, अंकेक्षणात घोळ, रजा रोखीकरणात जादा दिवसांची रजा जमा करणे, रजा नोंदीच्या दुरुस्तीवर योग्य कारवाई न करणे, वैद्यकीय रजा मंजुरीत घोळ घालणे आदी प्रकार सुरू आहेत.एसटीच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करावी आणि यवतमाळ विभागात सुरू असलेली अनागोंदी थांबवावी, अशी मागणी यवतमाळ आगारातील वाहक प्रवीण मिश्रा यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये केली होती. लेखा शाखेतील लेखाकार अविनाश मुक्तेश्वर दाणी हे १९९९-२००६ या कालावधीत आस्थापना शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही लोकांना नियमबाह्य आर्थिक लाभ करून दिल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. स्वत:च्या युनियनच्या लोकांना चुकीच्या पध्दतीने लाभ देण्यात आल्याचा आरोप मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत केला होता. रजा शिल्लक नसतानाही सुट्या मंजूर करून एसटीचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला.या तक्रारीच्या आधारे झालेल्या चौकशीत अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. रजा नोंद पुस्तिकेत जादा रजेची नोंद केल्याने संबंधिताला आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. यात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय वाहकाच्या निवडश्रेणीतही निष्काळजीपणा करण्यात आला. एसटीचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. ही माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. आणखी काही कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)