मुख्यालयातून अखेर बाहेर : १५ वर्षांचा निकष, आज आरोग्यचा दिवसयवतमाळ : जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बदली प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यालयी १५ वर्षाची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या थेट बदल्या करण्यात आल्या. त्यांच्याकडून संघटना पदाधिकारी, पुरस्कार मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र या सर्व सबबी बाजूला ठेऊन मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना पंचायत समितींचा रस्ता दाखविण्यात आला. जिल्हा परिषद मुख्यालयी राहण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अनेक कारणांचा आधार घेतला जातो. बदली प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी सामान्य प्रशासन आणि पंचायत विभागातील बदल्या करण्यात आल्या. यामध्ये कनिष्ठ सहायक ३८, वरिष्ठ सहायक १२, विस्तार अधिकारी सांख्यिकी तीन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एक, सहायक प्रशासन अधिकारी दोन यांची प्रशासकीय बदली करण्यात आली. तर सहायक प्रशासन अधिकारी एक, वरिष्ठ सहायक चार, कनिष्ठ सहायक सात यांची विनंती बदली करण्यात आली. या बदली प्रक्रियेत पेसा अंतर्गत येणाऱ्या भागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने बदलीचा लाभ देण्यात आला. त्यामुळे पेसा अंतर्गत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली आहे. या उलट सर्वसाधारण क्षेत्रात असणाऱ्या आणि १० ते १५ वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या काही कर्मचाऱ्यांना अद्यापही या बदली प्रक्रियेत घेण्यात आले नाही. मुख्यालयाबाबत सीईओंच्या कठोर भूमिकेचे सामान्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे. रिक्त झालेल्या या जागांवर आता कोणाला संधी मिळते, याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. पंचायत विभागातील बदली प्रक्रिया वृत्त लिहेस्तोवर सुरूच होती. त्यामुळे त्याची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)लेटलतिफांना नो-आॅप्शनबदली प्रक्रिया निर्धारित वेळेवर सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक जण वेळेत पोहोचू शकले नाही. अशा लेटलतिफ कर्मचाऱ्यांसाठी कोणतेच आॅप्शन ठेवण्यात आले नाही. थेट त्यांना बदली झालेल्या ठिकाणाचा आदेशच हाती सोपविण्यात आला.
जिल्हा परिषदेतील ‘मुक्कामी’ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: May 12, 2016 02:41 IST