शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात बदल

By admin | Updated: November 20, 2014 23:00 IST

शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना

नागरिकांना त्रास : पडताळणीसाठी येरझारा, सर्वांनाच आर्थिक भुर्दंडगणेश रांगणकर - नांदेपेराशासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे़ त्यासोबतच भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी ‘आम आदमी विमा’ योजना सुरू केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक असल्याची जाचक अट आहे. त्यामुळे या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढले आहे़ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर जात प्रमाणपत्र देऊन योजनेचा लाभही घेतला आहे़ विज्ञान शाखेत शिकणाऱ्या, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविताना जात वैधता प्रमाणपत्र मागितले जाते़ त्यासाठी विज्ञान शाखेत व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामार्फत जुनेच जात प्रमाणपत्र जोडून अमरावती येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयाकडे पडताळणी प्रस्ताव पाठविले आहे़ काही विद्यार्थ्यांनी जुन्याच जात प्रमाणपत्रावर नोकरीसुध्दा मिळविली आहे़ ज्यांनी नोकरी मिळविली, त्यांनासुध्दा आत जात वैधता प्रमाणत्र मागितले जात आहे़आता मात्र अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात शासनाने बदल केला आहे. त्यामुळे या प्रवर्गात्ील सर्वांना नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ परिणामी या प्रवर्गाील नागरिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडासह नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे़ तथापि शासनाने याबाबत कोणतेही शुध्दीपत्रकही काढले नाही़ केवळ मंत्रालयातील सचिवांचे पत्र पुढे करून नवीन जात प्रमाणपत्र प्रत्येक तहसील कार्यालयातून दिले जात आहे़ मात्र या प्रवर्गातील नागरिकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही़ जे विद्यार्थी, नोकरदार आपले जुने जात प्रमाणपत्र घेऊन अमरावती येथील जात पडताळणी समिती कार्यालयात प्रस्ताव घेऊन जात आहे, त्यांना आता नवीन जात प्रमाणपत्र काढून ते जोडून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या अशा निर्णयांमुळे या प्रवर्गात्ील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मात्र नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़पडताळणी जिल्हा ठिकाणी करावीविभागीय जात पडताळणी समितीचे कार्यालय अमरावती येथे आहे. वणीपासून हे ठिकाण किमान २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अमरावती येथे येण्या-जाण्याच्या प्रवासातच विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो़ त्याचबरोबर समितीचाही भोंगळ कारभार असल्याने दोन-चारदा चकरा माराव्या लागतात़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जात पडताळणी समिती कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे़