शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात बदल

By admin | Updated: November 20, 2014 23:00 IST

शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना

नागरिकांना त्रास : पडताळणीसाठी येरझारा, सर्वांनाच आर्थिक भुर्दंडगणेश रांगणकर - नांदेपेराशासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे़ त्यासोबतच भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी ‘आम आदमी विमा’ योजना सुरू केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक असल्याची जाचक अट आहे. त्यामुळे या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढले आहे़ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर जात प्रमाणपत्र देऊन योजनेचा लाभही घेतला आहे़ विज्ञान शाखेत शिकणाऱ्या, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविताना जात वैधता प्रमाणपत्र मागितले जाते़ त्यासाठी विज्ञान शाखेत व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामार्फत जुनेच जात प्रमाणपत्र जोडून अमरावती येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयाकडे पडताळणी प्रस्ताव पाठविले आहे़ काही विद्यार्थ्यांनी जुन्याच जात प्रमाणपत्रावर नोकरीसुध्दा मिळविली आहे़ ज्यांनी नोकरी मिळविली, त्यांनासुध्दा आत जात वैधता प्रमाणत्र मागितले जात आहे़आता मात्र अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात शासनाने बदल केला आहे. त्यामुळे या प्रवर्गात्ील सर्वांना नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ परिणामी या प्रवर्गाील नागरिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडासह नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे़ तथापि शासनाने याबाबत कोणतेही शुध्दीपत्रकही काढले नाही़ केवळ मंत्रालयातील सचिवांचे पत्र पुढे करून नवीन जात प्रमाणपत्र प्रत्येक तहसील कार्यालयातून दिले जात आहे़ मात्र या प्रवर्गातील नागरिकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही़ जे विद्यार्थी, नोकरदार आपले जुने जात प्रमाणपत्र घेऊन अमरावती येथील जात पडताळणी समिती कार्यालयात प्रस्ताव घेऊन जात आहे, त्यांना आता नवीन जात प्रमाणपत्र काढून ते जोडून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या अशा निर्णयांमुळे या प्रवर्गात्ील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मात्र नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़पडताळणी जिल्हा ठिकाणी करावीविभागीय जात पडताळणी समितीचे कार्यालय अमरावती येथे आहे. वणीपासून हे ठिकाण किमान २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अमरावती येथे येण्या-जाण्याच्या प्रवासातच विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो़ त्याचबरोबर समितीचाही भोंगळ कारभार असल्याने दोन-चारदा चकरा माराव्या लागतात़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जात पडताळणी समिती कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे़