शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:39 IST

जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा प्रयोग : उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार सामूहिक शेतीचे धडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर वारज गाव आहे. यवतमाळ तालुक्यातील या गावालगत वनविभागाची पाच हेक्टर जमीन आहे. यामध्ये सीताफळ, सहद, बोर आणि रानफळांची रेलचेल आहे. याच परिसरात वनविभाग चंदन पार्क साकारणार आहे.वनपर्यटन विकास योजनेतून चंदन पार्क होणार आहे. यासाठी ४५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. वनविभाग चंदनाचे रोप लावणार असून तयार होणारे रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे येथील चंदन तज्ज्ञ महेंद्र घागरे वनविभागाने मागणी केल्यास चंदनाची रोपे पुरविणार आहेत. चंदनाची शेती कशी करावी, अंतर किती असावे, संवर्धनासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे. चंदनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवे तंत्रज्ञान अवगत करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, चोरीला आळा घालण्यासाठी चंदनाच्या सामूहिक शेतीवर भर देणार आहे.त्याकरिता डेमो प्लॉटही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून चंदनाची शेती फायदेशीर ठरणारी आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य वनसंरक्षक कार्यालयाने पावले उचलली आहेत. यामुळे काही दिवसात वारज गावामध्ये चंदनाची सुंदर रोपवाटिका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.लातूरमध्ये प्रयोग यशस्वीलातूर जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. चंदन वृक्षाचे पान, फांद्या आणि खोडापासूनही विविध उत्पादने तयार होतात. यामुळे लातूरमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदन शेतीकडे वळत आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.वनपर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून चंदन पार्क उभे केले जात आहे. ही अभिनव संकल्पना शेतकºयांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.- भानुदास पिंगळे,उपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळशासनाचा एक पैसाही न घेता चंदनाची रोपे मोफत वाटण्याची मोहीमच आम्ही हाती घेतली आहे. राज्यासह परराज्यातही चंदन लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २५ लाख रोपांची लागवड झाली आहे. यातून प्रांत समृद्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.- महेंद्र घागरे,चंदन तज्ज्ञ,विद्यापीठ सिनेट सदस्य, पुणे

टॅग्स :forest departmentवनविभागYavatmalयवतमाळ