शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
5
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
7
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
8
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
9
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
10
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
11
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
12
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
13
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
14
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:39 IST

जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा प्रयोग : उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार सामूहिक शेतीचे धडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर वारज गाव आहे. यवतमाळ तालुक्यातील या गावालगत वनविभागाची पाच हेक्टर जमीन आहे. यामध्ये सीताफळ, सहद, बोर आणि रानफळांची रेलचेल आहे. याच परिसरात वनविभाग चंदन पार्क साकारणार आहे.वनपर्यटन विकास योजनेतून चंदन पार्क होणार आहे. यासाठी ४५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. वनविभाग चंदनाचे रोप लावणार असून तयार होणारे रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे येथील चंदन तज्ज्ञ महेंद्र घागरे वनविभागाने मागणी केल्यास चंदनाची रोपे पुरविणार आहेत. चंदनाची शेती कशी करावी, अंतर किती असावे, संवर्धनासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे. चंदनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवे तंत्रज्ञान अवगत करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, चोरीला आळा घालण्यासाठी चंदनाच्या सामूहिक शेतीवर भर देणार आहे.त्याकरिता डेमो प्लॉटही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून चंदनाची शेती फायदेशीर ठरणारी आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य वनसंरक्षक कार्यालयाने पावले उचलली आहेत. यामुळे काही दिवसात वारज गावामध्ये चंदनाची सुंदर रोपवाटिका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.लातूरमध्ये प्रयोग यशस्वीलातूर जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. चंदन वृक्षाचे पान, फांद्या आणि खोडापासूनही विविध उत्पादने तयार होतात. यामुळे लातूरमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदन शेतीकडे वळत आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.वनपर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून चंदन पार्क उभे केले जात आहे. ही अभिनव संकल्पना शेतकºयांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.- भानुदास पिंगळे,उपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळशासनाचा एक पैसाही न घेता चंदनाची रोपे मोफत वाटण्याची मोहीमच आम्ही हाती घेतली आहे. राज्यासह परराज्यातही चंदन लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २५ लाख रोपांची लागवड झाली आहे. यातून प्रांत समृद्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.- महेंद्र घागरे,चंदन तज्ज्ञ,विद्यापीठ सिनेट सदस्य, पुणे

टॅग्स :forest departmentवनविभागYavatmalयवतमाळ