शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:39 IST

जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा प्रयोग : उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार सामूहिक शेतीचे धडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर वारज गाव आहे. यवतमाळ तालुक्यातील या गावालगत वनविभागाची पाच हेक्टर जमीन आहे. यामध्ये सीताफळ, सहद, बोर आणि रानफळांची रेलचेल आहे. याच परिसरात वनविभाग चंदन पार्क साकारणार आहे.वनपर्यटन विकास योजनेतून चंदन पार्क होणार आहे. यासाठी ४५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. वनविभाग चंदनाचे रोप लावणार असून तयार होणारे रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे येथील चंदन तज्ज्ञ महेंद्र घागरे वनविभागाने मागणी केल्यास चंदनाची रोपे पुरविणार आहेत. चंदनाची शेती कशी करावी, अंतर किती असावे, संवर्धनासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे. चंदनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवे तंत्रज्ञान अवगत करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, चोरीला आळा घालण्यासाठी चंदनाच्या सामूहिक शेतीवर भर देणार आहे.त्याकरिता डेमो प्लॉटही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून चंदनाची शेती फायदेशीर ठरणारी आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य वनसंरक्षक कार्यालयाने पावले उचलली आहेत. यामुळे काही दिवसात वारज गावामध्ये चंदनाची सुंदर रोपवाटिका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.लातूरमध्ये प्रयोग यशस्वीलातूर जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. चंदन वृक्षाचे पान, फांद्या आणि खोडापासूनही विविध उत्पादने तयार होतात. यामुळे लातूरमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदन शेतीकडे वळत आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.वनपर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून चंदन पार्क उभे केले जात आहे. ही अभिनव संकल्पना शेतकºयांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.- भानुदास पिंगळे,उपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळशासनाचा एक पैसाही न घेता चंदनाची रोपे मोफत वाटण्याची मोहीमच आम्ही हाती घेतली आहे. राज्यासह परराज्यातही चंदन लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २५ लाख रोपांची लागवड झाली आहे. यातून प्रांत समृद्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.- महेंद्र घागरे,चंदन तज्ज्ञ,विद्यापीठ सिनेट सदस्य, पुणे

टॅग्स :forest departmentवनविभागYavatmalयवतमाळ