शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नव्या सभापतींपुढे शहर विकासाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:06 IST

येथील नगरपरिषदेत नवीन सभापती आरूढ झाले. आता त्यांच्यासमोर विकास कामांच्या आव्हाची मालिका उभी आहे. नगरपरिषदेत वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची संयुक्त सत्ता आली.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : वाढीव क्षेत्रातील कर आकारणीचा तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेत नवीन सभापती आरूढ झाले. आता त्यांच्यासमोर विकास कामांच्या आव्हाची मालिका उभी आहे.नगरपरिषदेत वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची संयुक्त सत्ता आली. भाजपाकडे सभागृहात पूर्ण बहुमत, तर नगराध्यक्ष शिवसेनेचे अशी विभागणी झाली. या विभागणीनंतर मागील वर्षभरात केवळ पक्षीय राजकारणाचा संघर्ष यवतमाळकरांना अनुभवायला मिळाला. आता नव्याने सभापतीपदी विराजमान झालेल्या नगरसेवकांपुढे अनेक आव्हाने आहे. शहरात एकाचवेळी सुरू झालेल्या गुंतागुंतीच्या विकास कामांमुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.नगरपरिषदेच्या स्थायी समिती असो की, सर्वसाधारण सभा, यात कधीच कुणाचे एकमत झाले नाही. वादावादी होत असल्याने विषय समित्याही पूर्ण क्षमतेने कधीच कार्यान्वित झाल्या नाही. बोटावर मोजण्याइतक्याच बैठका घेऊन जुन्या सभापतींचा कार्यकाळ संपला. आता नव्या सभापतींनी शहरातील व नगरपरिषदेतील विस्कटलेली प्रशासकीय घडी बसविण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.वाढीव क्षेत्रातील वाढीव कर आकारणीचा मुद घेऊन प्रसिद्धीस आलेले नगरसेवक दिनेश चिंडाले यांना भाजपाने आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली. बांधकाम समिती ही अनुभवी प्रवीण प्रजापती यांच्याकडे सोपविण्यात आली. या दोन समित्यांनी प्रशासनात समन्वय ठेवल्याशिवाय कुठलेही काम पूर्णत्वास जात नाही. गेल्या वर्षभराच्या काळात नगरसेवकांच्या हक्काची रस्ता व नाली याचे काम झाले नाही. केवळ कुरघोडी आणि विरोधाला विरोध करण्यातच वेळ निघून गेला.विरोधकांना विश्वासात घेण्याची गरजवाढीव क्षेत्रात आकारण्यात आलेल्या अवास्तव करामुळे नागरिक त्रस्त आहे. या भागात कुठलीही सुविधा मिळालेली नाही. याशिवाय शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. दुसरीकडे शहरातील अंतर्गत रस्ते विकास कामांमुळे अक्षरश: नष्ट केले जात आहे. धोरणात्मक आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेऊनच या समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो. त्यासाठी सभागृहात संख्येने कमी असलेल्या विरोधकांनाही विश्वासात घेणे आवश्यक आहे. केवळ पक्षश्रेष्ठी आणि पक्ष हिताचा निर्णय घेऊन शहराचा विकास साधता येणार नाही, एवढे निश्चित. गेले वर्षभर पालिकेत केवळ पक्षीय राजकारण चालले. त्याचा परिणाम सर्वांपुढे आहे. ही सर्व आव्हाने पेलूनच पाचही समितीच्या सभापतींना पुढील वर्षात वाटचाल करावयाची आहे.