शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मार्चपूर्वी निधी खर्चाचे आव्हान

By admin | Updated: March 4, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेसमोर येत्या ३१ मार्चपूर्वी प्राप्त निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

कोट्यवधींचा निधी : नवीन पदाधिकाऱ्यांना फटका यवतमाळ : जिल्हा परिषदेसमोर येत्या ३१ मार्चपूर्वी प्राप्त निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या निधीतून नवीन पदाधिकारी, सदस्यांना विकास कामे करता येणे शक्य नसल्याने त्यांना फटका बसणार आहे. नवीन पदाधिकारी सत्तारूढ होण्यास अद्याप तीन आठवड्यांचा अवधी आहे. तोपर्यंत मार्च महिन्याची ३१ तारीख उजाडणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त निधी खर्च करावा लागणार आहे. यापैकी काही निधी शासनाकडे प्रस्ताव पाठवून नव्याने मंजुरी घेऊन पुढील वर्षात खर्ची घालता येणार आहे. मात्र बहुतांश निधी ३१ मार्चपूर्वीच खर्च करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात विभाग प्रमुख व तालुकस्तरीय प्रमुखांची बैठक घेऊन सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. एकट्या बांधकाम विभागाकडे अद्याप दोन कोटी रूपये पडून आहेत. यातून काही कामे सुरू आहे. आचारसंहिता लागू असल्याने काही कामे रखडली होती. आता या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. २०१६-१७ मध्ये या विभागाला दोन कोटी ३० लाख ४१ हजारांचा निधी मिळाला होता. या निधीतून कामांचे नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे रखडली होती. आता मार्चचा धसका घेऊन कामांना गती देण्यात आली. ही कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे. मागील वर्षी प्राप्त निधीतून नवीन पदाधिकारी, सदस्यांना मात्र कोणतेही काम सुचविणे अशक्य आहे. त्यांना आता पुढील वर्षी प्राप्त निधीतूनच आपल्या मतदार संघातील विकास कामांना चालना देता येणार आहे. अर्थात किमान वर्षभर नवीन पदाधिकारी, सदस्यांना मतदार संघातील विकास कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल महिन्यात प्राप्त निधीतूनच त्यांना विकास कामे सुचवता येणार आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी, सदस्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)