शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

प्रतिनियुक्ती कर्मचार्‍यांचे सीईओंपुढे आव्हान

By admin | Updated: May 15, 2014 23:56 IST

जिल्हा परिषदेचे मुख्यालय प्रतिनियुक्तीच्या कर्मचार्‍यांनी हायज्ॉक केले आहे. बदली झाल्यानंतरही त्याच आस्थापनेवर प्रतिनियुक्ती मिळविण्याचा फंडा अनेक वर्षांपासून वापरल्या जात आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेचे मुख्यालय प्रतिनियुक्तीच्या कर्मचार्‍यांनी हायज्ॉक केले आहे. बदली झाल्यानंतरही त्याच आस्थापनेवर प्रतिनियुक्ती मिळविण्याचा फंडा अनेक वर्षांपासून वापरल्या जात आहे. या कर्मचार्‍यांची फळी तोडण्याचे आव्हान सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यापुढे आहे.

प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी तीन वर्षानंतर कर्मचार्‍यांची प्रशासकीय बदली करण्याचा नियम आहे. मात्र जिल्हा परिषदेत या नियमाला पद्धतशीरपणे हरताळ फासला जात आहे. काही अधिकारी, पदाधिकारी यांची मर्जी संपादित करून अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्मचार्‍यांनी ठिय्या मांडला आहे. अशा कर्मचार्‍यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामाची गती मंदावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आठ ते दहा वर्षापर्यंत एकाच टेबलवर काम करण्याचा रेकॉर्ड करणारे कर्मचारी येथे आजही कार्यरत आहे. या कर्मचार्‍यांमध्ये आपणास कुणीही हात लावू शकत नाही, असा समज निर्माण झाला आहे. काही झाले तरी आयुक्तांकडून प्रतिनियुक्ती मिळून आपली जागा अबाधित ठेवतात.

काही कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊनही त्यांना वरिष्ठांकडून कार्यमुक्त केले जात नाही, अशा कर्मचार्‍यांवर विशिष्ट स्वरुपाची जबाबदारी सोपविली जाते. जवळपास सर्वच विभागात अशी विशिष्ट जबाबदारी पार पाडणारे कर्मचारी कार्यरत आहे. विशेष म्हणजे प्रतिनियुक्तीसाठी पद अवनती स्वीकारण्याची तयारीही कर्मचार्‍यांमध्ये आहे.

बदली होऊनही त्याच ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांकडे पाहून सर्वसामान्य कर्मचार्‍यांमध्ये चिड निर्माण होत आहे. मर्जी संपादित करणार्‍यांसाठी नियम ढाब्यावर बसवून सवलती दिल्या जातात. केवळ आर्थिक सुबत्ता आणि राजकीय पाठबळ नसल्यामुळे नियमाप्रमाणे बदली होईल तेथे जावे लागते. अशा स्थितीत काही विशिष्ट कर्मचार्‍यांवर अन्यायही होतो.

जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या विभागांतर्गतही बदल्या झालेल्या नाही. या बदल्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी सीईओ नवलकिशोर राम यांनी केला. मात्र नंतर हे प्रकरण पद्धतशीरपणे थंडबस्त्यात टाकण्यात आले. मरगळ झटकण्यासाठी संपूर्ण विभागातच मोठय़ा ऑपरेशनची गरज आहे. सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी बदल्यांपूर्वी कशाप्रकारे ही स्थिती हाताळतात, याकडे कर्मचार्‍यांसोबतच सर्वांचेच लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)