शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

गोवंश तस्करीविरोधात चक्काजाम

By admin | Updated: July 23, 2016 00:08 IST

गोवंध तस्करीविरोधात लगतच्या पिंपळखुटी येथे हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.

राष्ट्रीय महामार्ग ठप्प : हिंदू रामसेना, बजरंग दल, विहिंपचा सहभाग पाटणबोरी : गोवंध तस्करीविरोधात लगतच्या पिंपळखुटी येथे हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गोवंश बंदी कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करूनही गोवंश भरलेली वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरून कत्तलीसाठी हैद्राबादकडे जात असल्याचे दिसून येते. या वाहनांना सामाजिक संघटना तथा पोलिसांनी कित्येकदा पकडलेसुद्धा आहे. आत्तापर्यंत अंदाजे १५ ते २० कारवायासुद्धा झाल्या. यावरून राष्ट्रीय महामार्गाने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या निर्देशानुसार नाकाबंद करण्यात आली असली तरी काही अधिकाऱ्यांमुळे गोवंश तस्करी सुरू असल्याचा आरोप यावेळी हिंदू रामसेनेने केला. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी चौकशी पथक नेमून अतिशिघ्र कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दल व राम सेनेने केली आहे. गोवंश तस्करांचा पाठलाग करताना कित्येकदा तस्करांकडून गोभक्तांच्या वाहनाला धडक दिली जाते. यात जिवीतहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरून होणारी जनावरांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात फोफावली असून गोधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची दखल घेत हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार पिंपळखुटी येथे दुपारी १२ वाजता हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष तिरूपती कंदकुरीवार, हिंदू रामसेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अल्लुरवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रूपेश शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप धवने, बजरंग जिल्हा आखाडाचे संयोजक सचिन पारोजवार, शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर येरमे, भाजपा शहराध्यक्ष गजानन शिंगेवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन पुल्लीवार, विनोद वकील, गजू राजूलवार, शहारूख खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. (वार्ताहर) नाकाबंदीदरम्यान नऊ जनावरांची सुटका पांढरकवडा : केळापूर येथील फिक्स पॉर्इंटजवळ करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान कत्तलीसाठी जाणाऱ्या सात गायी व दोन कालवडींची पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सुटका केली. याप्रकरणी चौैघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरसे हे नाकाबंदी करीत असताना ट्रक क्रमांक टी.एस.१६-यु.ए.७९८६ मध्ये जनावरे नेत असल्याची त्यांना शंका आली. हा ट्रक बाजूला घेऊन त्याची पाहणी केली असता, आतमध्ये सात गायी व दोन कालवडींना अतिशय निर्दयीपणे हातपाय बांधून असल्याचे आढळून आले. या गायीची पोलिसांनी ट्रकमधून सुटका केली. या गायीची किंमत एक लाख ८२ हजार असून८ ट्रकची किंमत सहा लाख रूपये आहे. असा एकूण सात लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक मोहम्मद अमरूद्दीन मोहम्मद नसरूद्दीन (३०) रा.पेरडीकोट, जि.निजामबाद (तेलंगणा), प्रकाश तेलंगे (२५) रा.हुसा, ता.नायगाव (नांदेड), कोरल्ला गंगारेड्डी (५०) रा.पडगलल (तेलंगणा), रंजीत शंकर नामुला (३२) रा.बोदेपेल्ली (तेलंगणा) असे अटकेतील तस्करांची नावे आहेत. (शहर प्रतिनिधी)