शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

सभापतीची चाबी शिरपूर गणाकडे

By admin | Updated: January 21, 2017 01:33 IST

जिल्हा परिषद - पंचायत समिती गट व गणांची निवडणूक येत्या १६ फेब्रुवारीला होत आहे.

महिलांच्या आशा पल्लवित : सामान्य गणांकडेही महिलांच्या नजरा वणी : जिल्हा परिषद - पंचायत समिती गट व गणांची निवडणूक येत्या १६ फेब्रुवारीला होत आहे. जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी तीन गट मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्याने अनेकांची मिनी मंत्रालयात जाण्याची स्वप्ने भंगली. त्यामुळे पंचायत समितीचा शिलेदार बनून मिनी मंत्रालयात पाय ठेवता येईल, असेही मनसुबे अनेकांनी रचले होते. मात्र गुरूवारी पंचायत समिती सभापतीचे निघालेले नामाप्र महिला आरक्षणसुद्धा अनेकांच्या तोंडचा घास पळविणारे ठरले. वणी पंचायत समितीच्या १७ व्या सभापतीची चाबी अधिकृतरित्या शिरपूर गणाकडे गेली आहे. मागील १५ वर्षांपासून तीन महिलांनी पंचायत समिती सभापतीचे पद भूषविले. यामाध्ये राजूर गणातील वसुंधरा गजभीये, कायर गणातील अल्का कोरवते व नांदेपेरा गणातून शालिनी सोमलकर या पदारूढ झाल्या होत्या. शिरपूर गणातून एकदाच अनिल राजूरकर यांच्या हाती चाबी गेली होती. १०-१२ वर्षानंतर पुन्हा शिरपूर गावाकडे ही संधी आली आहे. आठ गणांपैकी केवळ शिरपूर गणच नामाप्र महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे आता या गणातून निवडणूक लढविण्यासाठी महिलांची सर्वच पक्षाकडे मागणी वाढणार आहे. पक्षसुद्धा सभापतीची खुर्ची सांभाळू शकणाऱ्या सक्षम महिलेसाठी राखीव असल्याने या गणातून जर ओबीसी महिला निवडूनन आली, तर तिलासुद्धा सभापतीचा दावेदार बनता येणार आहे. तसेच शिंदोला, लाठी, घोन्सा, चिखलगाव या गणातून पुरूषांची मक्तेदारी मोडून महिलांनी निवडणूक लढविली व महिलेच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि ती महिला नामाप्र प्रवर्गाची असेल, तर त्यांनासुद्धा सभापतीच्या पदाचा लाभ घेता येतो. त्यामुळे ज्यांच्या आरक्षणामुळे आशा भंगल्या त्या महिला सामान्य गणात नशिब अजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमा विजय पिदूरकर, संगीता अनिल राजूरकर, रूपलता संजय निखाडे, शालिनी अभय सोमलकर, उषा सुधाकर गोरे यांपैकी काही चेहरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे. आठपैकी चार गण महिलांसाठी राखीव असले तरी चारपेक्षा अधिक महिला निवडून आल्या, तर तो महिलांच्या पुढारीपणाचा विजय ठरू शकतो. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तस-तसे राजकीय वातावरण गरम होत आहे. तिकीट मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे. सारेच निष्ठावान गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे तिकीट वाटप करताना पक्षनेत्यांची चांगलीच कसरत होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) पाच महिला बनल्या उपसभापती वणी पंचायत समितीच्या उपसभापतीची धुरा आत्तापर्यंत पाच महिलांनी यशस्वीपणे पेलली आहे. त्यामध्ये शकुंतला गिरी (९२-९३), रेखा पानघाटे (९८-९९), विमल मडावी (२००५-०७), वृषाली खानझोडे (१२-१४) व रूपलता निखाडे (१४-१७) यांचा समावेश आहे. आता निवडणूक लढविण्यास रूपलता निखाडे यांना बढती घेण्याची संधी आहे. मात्र या निवडणूक लढविण्याच्या मुडमध्ये नसल्याचे समजते.