शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आश्रमशाळांच्या असुविधांची केंद्रीय आयोगाकडून दखल

By admin | Updated: September 20, 2015 00:19 IST

जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारीवर आयोग गंभीर असून ...

रामेश्वर उराव यांची माहिती : प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन आयोग तपासणी करणार, जात प्रमाणपत्राचीही पडताळणीपांढरकवडा : जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारीवर आयोग गंभीर असून त्याची दखल घेणार असल्याचे केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर उराव यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात सकाळी घेतलेल्या बैठकीत सांगितले.सर्व तक्रारींचा पाठपुरावा करून आश्रम शाळेला भेटी देऊन, सत्य परिस्थिती बाहेर आणून आदिवासींना त्यांचे हक्क मिळावे, या दृष्टीने आयोग कार्य करीत असून या तक्रारीची चौकशी करून जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला योग्य सुखसुविधा देण्याचे निर्देश देणार असल्याचे डॉ.उराव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आयोगाचे निरीक्षक केतन शर्मा, आमदार प्रा.राजू तोडसाम, अप्पर आयुक्त अशोक आत्राम, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संभाजीराव सरकुंडे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, अरूण देऊळकर, मदन जिड्डेवार, बशीर भाई, रमेश उग्गेवार, मंगेश वारेकर, धर्मा आत्राम, बळवंत नैताम, शिवारेड्डी पाटील, महादेव सूरपाम, भावराव मरापे, धर्मा आत्राम उपस्थित होते. डॉ.उराव पुढे म्हणाले की, देशामधील अनेक आश्रमशाळांमध्ये योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यात जिल्ह्यासह या आश्रमशाळेच्या असुविधेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. या तक्रारींची आयोगाने गंभीर दखल घेतली असून आयोग स्वत: आश्रम शाळेची तपासणी करीत आहे. तसेच आलेल्या तक्रारीबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे, अशा आश्रमशाळांची तपासणी करून राज्य शासनाला योग्य सुखसुविधा पुरविण्यासाठी आयोग निर्देश देणार आहेत, तसेच गरज पडल्यास केंद्र सरकारचा निधीसुद्धा आयोग उपलब्ध करून देणार आहे, असे ते म्हणाले. तसेच आयोगाला बनाटव जाती प्रमाणपत्राबाबतही अनेक तक्रारी आल्या असून बनावट जाती प्रमाणपत्राच्या आधारे अनेकजण आदिवासींच्या योजनेचा लाभ घेत आहे. अशा बनावट आदिवासींवर आयोग कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासींच्या हक्काबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या असुविधेबाबत आलेल्या तक्रारीत योग्य निवास, भोजन, शिक्षण मिळत नसल्याचा उल्लेख आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, योग्य भोजन मिळावे, यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. येथील विश्रामगृहात सकाळी डॉ.उराव यांचे आगमन झाले. त्यांचे स्वागत आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी केले. त्यानंतर उराव यांनी नेते, लोकप्रतिनिधी व पत्रकारांशी संवाद साधला. नंतर नागरिकांनी समस्येबाबत आणलेले निवेदन स्विकारले. यानंतर ते प्रा.तोडसाम यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)