शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ’ शाळांना मिळणार केंद्राचा पुरस्कार

By admin | Updated: July 9, 2016 00:36 IST

केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर गौरव३१ जुलैपर्यंत नोंदणी, शासकीय व अनुदानित शाळा पात्र भंडारा : केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने २ आॅक्टोबर २०१४ पासून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ मिळावा यासाठी १ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. केंद्राने या विशेष अभियानाची दखल घेत राज्याचा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर लागू केला आहे. देशाची भावी पिढी शाळामध्ये आकार घेत असते. मुलांना लहान वयात लागलेल्या सवयी आयुष्यभर पुरतात. स्वच्छतेची सवय जर शाळेतील मुलांना लागली तर येणारी पिढी ही आरोग्य संपन्न व सुदृढ निपजेल. म्हणूनच असे कार्यक्रम हाती घेवून ते यशस्वी करण्याचा मानस या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाने व्यक्त केला आहे. या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर १०० शाळा, राज्य पातळीवर ४० शाळा आणि जिल्हा पातळीवर ४८ शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यातील ७० टक्के पुरस्कार हे ग्रामीण भागातील शाळांना देण्यात येतील. पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा ५ क्षेत्रांमध्ये एकूण ३९ घटक निश्चित करण्यात आले आहेत. शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांची श्रेणी निश्चित करण्यात येईल व त्यावरूनच पुरस्कार विज्येत्या शाळेची निवड केली जाईल. शाळांना ३१ जुलैपूर्वी या पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. शाळांमधील संस्कार कायमस्वरूपी राहतील असा या मागचा उद्देश आहे. (शहर प्रतिनिधी) पुरस्कारासाठी व्हीसीशिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ५ जुलैला खास व्हीसी लावून याबाबत माहिती दिली. यावेळी उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, विद्या परिषदचे संचालक गोविंद नांदेडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग, युनीसेफचे आनंद बोरसे, सिद्धेश वाडकर यावेळी उपस्थित होते. निवड समितीचे गठणतालुका, जिल्हा व राज्य स्तरावर शाळा निवडीसाठी समित्या गठीत करण्यात येईल. तालुकास्तर समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तर राज्यस्तर समितीचे अध्यक्ष शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असणार आहेत.गुणांचे निकष व संकेत ९० ते १०० गुण हिरवा रंग ७५ ते ८९ गुण निळा रंग ५१ ते ७४ गुण पिवळा रंग३५ ते ५० गुण केशरी रंग३५ पेक्षा कमी लाल रंगव्हीडीओ कॉन्फरन्सीगमधून शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.-किसन शेंडे, शिक्षणाधिकारी भंडारा.शासनाचा हा स्तूत्य उपक्रम आहे. उशिरा का होईना एकदाचा स्वच्छ शाळांना पुरस्कार मिळतील. स्वच्छ, सुंदर व आदर्श शाळा ठेवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची ही पोचपावती ठरणार आहे. पुरस्कार मिळणार असल्याने शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे.-मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.