शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

शतकोटीचा हिशेब जुळेना

By admin | Updated: June 8, 2015 00:13 IST

महत्त्वाकांक्षी शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविणाऱ्या विविध विभागात समन्वयाच्या अभावाने आतापर्यंत ..

खर्चाच्या माहितीस टाळाटाळ : योजना राबविणाऱ्या विभागात समन्वयाचा अभावयवतमाळ : महत्त्वाकांक्षी शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविणाऱ्या विविध विभागात समन्वयाच्या अभावाने आतापर्यंत नेमका किती खर्च झाला आणि लागवड कुठे झाली याचा ताळमेळच जुळत नाही. कोट्यवधी रुपये खर्च झाले असले तरी झाडे किती जिवंत आहे हा संबंधित विभागासाठीसुद्धा संशोधनाचा विषय आहे. शासनाने २०११-१२ मध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजना जाहीर केली. त्यासाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. ही योजना कृषी विभाग, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, वन विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर विभागाच्यावतीने राबविली जाते. प्रत्येक विभागाला दरवर्षी स्वतंत्र उद्दिष्ट दिले जाते. या विभागात योजना राबविण्यासाठी समन्वय दिसत नाही. दरवर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. प्रत्यक्षात वृक्ष लागवड होतच नसल्याचे दिसून येते. या योजनेवर काम करणाऱ्या यंत्रणेतील गोंधळामुळे बरेचदा एकाच ठिकाणी लावलेल्या वृक्षावर पाचही विभाग दावा करतात. शिवाय लाखोंचे उद्दिष्ट घेऊन लागवड केलेल्या वृक्षांपैकी किती झाडे जिवंत आहे याबाबत कोणत्याच विभागाकडून ठामपणे सांगितले जात नाही. ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिकांची निर्मिती करण्यात आली. यातील बहुतांश रोपवाटिका केवळ अनुदानापुरत्याच अस्तित्वात आल्या. आज आठ रोपवाटिका ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र तेथील स्थिती वेगळीच आहे. असे असताना पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील विविध विभागांना ३८ लाख २० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)योजनेच्या आॅडिटची अधिकाऱ्यांमध्ये धास्ती कळंब : शतकोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेचे आॅडिट करण्याचे जाहीर केले. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. तपासणी पथकाला कुठले झाड जिवंत दाखवायचे याची चिंता या अधिकाऱ्यांना लागली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड झालेल्या ठिकाणी २० टक्केही झाडे जिवंत दिसत नाही. या योजनेचे प्रामाणिकपणे आॅडिट झाल्यास बहुतांश अधिकारी यात दोषी आढळतील. खड्डा तोच, रोपटे नवे जिल्ह्यात २०११ पासून शतकोटी योजना राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र दरवर्षी त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते. निकषाप्रमाणे एक महिन्यापूर्वी अडीच फुटाचा खड्डा खोदणे त्यात विटांचा चुरा, शेणखत, काळी माती असा दीड फूट भराव दिल्यानंतर किमान दीड ते दोन फूट उंचीचे रोपटे लावणे अपेक्षित आहे.