शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कपाशी, सोयाबीन संकटात

By admin | Updated: October 26, 2014 22:48 IST

गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता

वणी : गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे. कापूस वेचणी आणि सोयबीन सवंगणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ होत आहे.मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने नंतर दोन दिवस संततधार हजेरी लावली होती. तत्पूर्वी महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा मोड आल्याने शेतकरी संकटात सापडले होते. अखेर कशी तरी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. सध्या तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, ७ हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारी उभी आहे. आता कपाशी फुटली आहे. शेतात पांढरी बोंडे दिसत आहे. सोबतच सोयाबिनही आता सवंगणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच सोयाबिनची सवंगणीही केली आहे. त्यांनी शेतातच सोयाबिनचे ढीग मारून ठेवले आहेत. काही शेते कापसाने पांढरी दिसू लागली आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.गेल्या शुक्रवारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसा आणि रात्रीही तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कापूस ओला होत आहे. परिणामी त्याची प्रतवारी घसरण्याची चिंता सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस कुटून आहे. मात्र दिवाळीमुळे वेचणीला मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे हा कापूस शेतातच ओला होत आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची सवंगणी केली आहे. त्यांनी शेतात सोयाबिनचे ढिग लावले आहे. दिवाळीमुळे मजूर न मिळाल्याने त्यांना सोयाबीन काढता आले नाही. आता सोयाबिनचे हे ढिगही पावसाने ओले होत आहे.यापूर्वी पावसाअभावी दुबार, तिबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. आधीच कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाच्या दडीने त्यांना दुसऱ्यांदा बियाणे घ्यावे लागले. आता पीक हातातोंडाशी आले असताना पुन्हा निसर्ग त्यांच्या अंत पाहात आहे. उभे पीक हातचे जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)