शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कपाशी, सोयाबीन संकटात

By admin | Updated: October 26, 2014 22:48 IST

गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता

वणी : गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे. कापूस वेचणी आणि सोयबीन सवंगणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ होत आहे.मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने नंतर दोन दिवस संततधार हजेरी लावली होती. तत्पूर्वी महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा मोड आल्याने शेतकरी संकटात सापडले होते. अखेर कशी तरी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. सध्या तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, ७ हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारी उभी आहे. आता कपाशी फुटली आहे. शेतात पांढरी बोंडे दिसत आहे. सोबतच सोयाबिनही आता सवंगणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच सोयाबिनची सवंगणीही केली आहे. त्यांनी शेतातच सोयाबिनचे ढीग मारून ठेवले आहेत. काही शेते कापसाने पांढरी दिसू लागली आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.गेल्या शुक्रवारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसा आणि रात्रीही तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कापूस ओला होत आहे. परिणामी त्याची प्रतवारी घसरण्याची चिंता सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस कुटून आहे. मात्र दिवाळीमुळे वेचणीला मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे हा कापूस शेतातच ओला होत आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची सवंगणी केली आहे. त्यांनी शेतात सोयाबिनचे ढिग लावले आहे. दिवाळीमुळे मजूर न मिळाल्याने त्यांना सोयाबीन काढता आले नाही. आता सोयाबिनचे हे ढिगही पावसाने ओले होत आहे.यापूर्वी पावसाअभावी दुबार, तिबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. आधीच कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाच्या दडीने त्यांना दुसऱ्यांदा बियाणे घ्यावे लागले. आता पीक हातातोंडाशी आले असताना पुन्हा निसर्ग त्यांच्या अंत पाहात आहे. उभे पीक हातचे जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)