शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

भाजीपाल्याच्या शेतात सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:01 IST

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहे.

ठळक मुद्देकवडीमोल भाव : शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नाही

सदानंद लाहेवार।ऑनलाईन लोकमतबिजोरा : शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहे. शासनाच्या उदासीन धारेणामुळे शेतकरी देशोधडीस लागला असताना आता बागायती शेतकरीही त्याच वाटेवर आहे.महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती शेतकरी केली जाते. खरीप हंगामात काहीही उरले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला आहे. टोमॅटो, वांगे, फुलकोबी, पानकोबी, काकडी, पालक, सांभार, वाल आदी पालेभाज्याला लावल्या आहे. परंतु या भाज्यांनासध्या बाजारात भावच नाही. कोबीच्या एका कट्ट्याला २५ ते ३० रुपयेच मिळत आहे. पालकाला तर कुणी हातही लावत नाही. टोमॅटो चिल्लर बाजारात दहा रुपयाला दीड किलो मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल कुणी घेत नाही. दूरच्या बाजारपेठेत भाजीपाला पाठवावा तर वाहतूक खर्चही निघत नाही. लावलागवड, बियाणे, फवारणी यासह तोडणीची मजुरी असा प्रचंड खर्च शेतकऱ्यांला करावा लागत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आता गुरे सोडली आहे. जनावरांना चारा तरी होईल, अशी आशा आहे.शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडाअनेक शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ भाजीपाल्यावर चालविले जाते. नगदी पैसे हातात येत असल्याने कोणतीही अडचण जात नाही. परंतु यावर्षी भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे घर खर्च चालवावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भाजीपाल्यातून समृद्धीच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे.