शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उमेदवार मतदारांच्या दारात

By admin | Updated: November 5, 2016 00:12 IST

नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर असली तरी आतापासूनच अनेक उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले आहे.

विड्रॉलसाठी सात दिवस : आठ नगरपरिषदांत पाच लाख मतदारयवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर असली तरी आतापासूनच अनेक उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले आहे. प्रचाराचा अधिकृत नारळ फोडण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपली व्यक्तिगत यंत्रणा कामाला लावली असून सकाळ-संध्याकाळ मतांचा जोगवा मागताना दिसत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून बुधवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. आठ नगरपरिषदांतील ३७० नामांकन अर्ज छाननीत बाद झाले. १२४७ अर्ज मंजूर झाले. आता उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर आहे. निवडणुकीचे अद्याप चित्र स्पष्ट नाही. परंतु अनेक उमेदवारांनी आपल्या व्यक्तिगत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवाराकडून मतदारांची मनधरणी सुरू केली आहे. उमेदवार आपला माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांची विशेष बडदास्त ठेवत आहे. जाहीर प्रचारासाठी पक्षाकडून मिळणाऱ्या साहित्याची वाट न बघता उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार साहित्यांचा वापर सुरू केला आहे. यासाठी खास शैलीतील पत्रके वाटली जात आहे. यामध्ये त्या-त्या प्रभागातील समस्यांवर भर दिला जात आहे. प्रभागातील राजकीय घडामोडींचा फायदा घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. आता मतदारांमध्येही जाहीर प्रचाराची क्रेझ राहिली नाही. त्यामुळे थेट भेटीवरच भर दिला जात आहे. उमेदवार आपली भूमिका समजावून सांगत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेवणावळीही उठत आहे. पक्षाकडून प्रचारसाहित्य आणि निधीहीची प्रतीक्षा न करता अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी आपला खिसा सैल केला आहे. तर काहींनी विधान परिषदेतील उमेदवाराकडून ‘टोकन’ मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्याच गंगाजळीवर नगरपरिषद निवडणुकीचे नियोजन केले जात आहे. सर्वाधिक मतदार यवतमाळात आठ नगरपरिषदेपैकी सर्वाधिक मतदार यवतमळात असून ४ लाख ६९ हजार ५७७ मतदारपैकी २ लाख ३३ हजार १५० मतदार आहेत. पुसद ५५ हजार ७६७, वणी ४५ हजार ९२३, उमरखेड ३६ हजार ९३९, दिग्रस ३१ हजार ७८७, दारव्हा २७ हजार ७५, आर्णी २३ हजार ३९३ तर घाटंजीत १५ हजार ५४३ मतदार आहेत. नगराध्यक्षाच्या आठ जागेसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी तर रात्रीचा दिवस केला आहे. यवतमाळात लढतांना विधानसभे इतकेच नियोजन करावे लागत आहे. एकट्यास शहरात २९१ मदतान केंद्र राहणार आहे. त्यानुसार बुथ रचना करण्याची कसरत आहे. चिन्हाची प्रतीक्षाअपक्ष उमेदवाराकडे चिन्ह नसल्याने त्यांना प्रचार करताना अडचण येत आहे. ११ नोव्हेंबरला दुपारी तीन नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पाड पडणार आहे. तोपर्यंत तरी अपक्षांना केवळ मी उमेदवार आहे इतकेच मतदारांना सांगत आहे.