शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

कालवा कचऱ्याने अडला; रबीची काळजी तुंबली

By admin | Updated: November 18, 2015 02:32 IST

हस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.

अभियंत्याचे दुर्लक्ष : जमीन तयार; आता प्रतीक्षा पाण्याचीआरिफ अली बाभूळगावहस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा असली तरी कालवे विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनीच या ठिकाणी भेट देण्याची मागणी होत आहे. रबी हंगामाकरिता प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्यामधून सोडण्यात आले आहे. मात्र यातील पाणी हस्तापूर-सावंगी (मांग) रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचतच नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहे. पाटसऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काडीकचरा गोळा झाला आहे. झाडेझुडपेही वाढली आहे. यामुळे पाणी येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पाणी सोडण्यापूर्वीचे नियोजन कालवे विभागाने केलेच नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा आता संकटात सापडला आहे. रबी हंगामात गहू, हरभरा याकरिता शेतकऱ्यांनी आपली जमीन तयार करून ठेवली आहे. मात्र हस्तापूर मार्गावरील सुरुवातीचे चार-पाच शेत वगळता पाणी पुढे सरकायलाच तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र त्याचा काहीही उपयोग होवू शकला नाही. नंतर शेतकऱ्यांनी उपअभियंता जळेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. आपला प्रभार पी.एन. गोतमारे यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. गोतमारे यांच्याकडूनही व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे जमीन तयार करून पाण्याच्या प्रतीक्षेत बसून असलेले शेतकरी मेटाकुटीस आले आहे. सध्याच्या स्थितीत कृष्णा दांडगे, संजय मदने, अरुण मदने, संजय खोडे, शेख रहेमतुल्ला, किशोरीलाल गुप्ता, बबलू दातारकर, अभय तातेड, वैभव चेंडकापुरे, शहेजाद शेख, अशोक रोम, सैयद जहीर, नरेश चेंडकापुरे, नयना चेंडकापुरे, गारगाटे, डवले, भाऊ ठाकरे, नंदकुमार गुप्ता आदी शेतकरी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या धुऱ्यावर केवळ कालव्याच्या पाण्याची ओल आली आहे. सोयाबीनने दगा दिल्यामुळे रबी हंगामावर आशा लावून बसलेला शेतकरी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे खचून गेला आहे. आता अधीक्षक अभियंत्यांनी या ठिकाणी भेट द्यावी, अशी मागणी होत आहे.