शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कालवा कचऱ्याने अडला; रबीची काळजी तुंबली

By admin | Updated: November 18, 2015 02:32 IST

हस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.

अभियंत्याचे दुर्लक्ष : जमीन तयार; आता प्रतीक्षा पाण्याचीआरिफ अली बाभूळगावहस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा असली तरी कालवे विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनीच या ठिकाणी भेट देण्याची मागणी होत आहे. रबी हंगामाकरिता प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्यामधून सोडण्यात आले आहे. मात्र यातील पाणी हस्तापूर-सावंगी (मांग) रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचतच नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहे. पाटसऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काडीकचरा गोळा झाला आहे. झाडेझुडपेही वाढली आहे. यामुळे पाणी येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पाणी सोडण्यापूर्वीचे नियोजन कालवे विभागाने केलेच नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा आता संकटात सापडला आहे. रबी हंगामात गहू, हरभरा याकरिता शेतकऱ्यांनी आपली जमीन तयार करून ठेवली आहे. मात्र हस्तापूर मार्गावरील सुरुवातीचे चार-पाच शेत वगळता पाणी पुढे सरकायलाच तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र त्याचा काहीही उपयोग होवू शकला नाही. नंतर शेतकऱ्यांनी उपअभियंता जळेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. आपला प्रभार पी.एन. गोतमारे यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. गोतमारे यांच्याकडूनही व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे जमीन तयार करून पाण्याच्या प्रतीक्षेत बसून असलेले शेतकरी मेटाकुटीस आले आहे. सध्याच्या स्थितीत कृष्णा दांडगे, संजय मदने, अरुण मदने, संजय खोडे, शेख रहेमतुल्ला, किशोरीलाल गुप्ता, बबलू दातारकर, अभय तातेड, वैभव चेंडकापुरे, शहेजाद शेख, अशोक रोम, सैयद जहीर, नरेश चेंडकापुरे, नयना चेंडकापुरे, गारगाटे, डवले, भाऊ ठाकरे, नंदकुमार गुप्ता आदी शेतकरी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या धुऱ्यावर केवळ कालव्याच्या पाण्याची ओल आली आहे. सोयाबीनने दगा दिल्यामुळे रबी हंगामावर आशा लावून बसलेला शेतकरी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे खचून गेला आहे. आता अधीक्षक अभियंत्यांनी या ठिकाणी भेट द्यावी, अशी मागणी होत आहे.