शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांची अवस्था बिकट

By admin | Updated: October 17, 2015 00:44 IST

सिंचनातून समृद्धीसाठी बांधलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रबी हंगाम तोंडावर आला तरी देखभाल दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ झाला नाही.

रबी हंगाम : देखभाल दुरुस्तीच्या कामांना प्रारंंभच नाही पुसद/ उमरखेड : सिंचनातून समृद्धीसाठी बांधलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रबी हंगाम तोंडावर आला तरी देखभाल दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ झाला नाही. ठिकठिकाणच्या कालव्यात झुडूपे वाढले असून अनेक कालव्यांचे गेटही लंपास झाले आहे. अशा स्थितीत टेलपर्यंत पाणी पोहोचण्याची सूतराम शक्यता नाही. पुसद आणि उमरखेड उपविभागात असलेल्या सिंचन प्रकल्पातून आजही पूर्ण क्षमतेने सिंचन होताना दिसत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे कालव्याची झालेली दयनीय अवस्था आहे. इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा डावा कालवा उमरखेड तालुक्यातून जातो. मात्र या कालव्याची स्थिती दयनीय झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडूपी वनस्पती वाढली आहे. अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी चोरट्यांनी चक्क कालव्याचे गेटच लंपास केले आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता राहत नाही. यंदा अपुऱ्या पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे अल्पप्रमाणात पाणी सोडले जाणार आहे. सोडलेले पाणी शेतापर्यंत कसे पोहोचेल हाच प्रश्न आहे. उमरखेड तालुक्यासारखीच अवस्था महागाव तालुक्याचीही आहे. वेणी प्रकल्पाच्या निर्मितीपासून पूर्ण क्षमतेने कधीही सिंचन झाले नाही. या प्रकल्पाच्या कालव्यावर अनेक शेतकरी शेती करतात. परंतु त्यांना योग्य वेळी पाणीच मिळत नाही. अनेकदा तर कालव्यातून पाणी शेतात पाझरते त्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप निर्माण होते. पुसद तालुक्यातील कालव्यांचीही अशीच अवस्था आहे. निर्मितीपासूनच कालवे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. या कालव्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु कायम स्वरूपी दुरुस्ती केली जात नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारीही कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न मात्र अपूर्ण राहते. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या असलेले कर्मचारी कधीही कालव्याची पाहणी करताना दिसत नसल्याचे शेतकरी सांगतात. (लोकमत चमू) खरुसच्या शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत चालगणी शाखेच्या लघु वितरिकेसाठी खरुस येथील शेतकऱ्यांची जमीन २०१२ मध्ये संपादित करण्यात आली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. पांडुरंग वानखडे यांची २५ गुंठे जमीन संपादित करण्यात आली. तिचा मोबदला दोन लाख ३१ हजार १६३ रुपये, सत्यपाल कांबळे यांच्या चार गुंठे जमिनीचा मोबदला ४० हजार ३२५ रुपये तर श्रीराम वानखेडे यांच्या १६ गुंठे जमिनीचा मोबदला एक लाख ६१ हजार २९८ रुपये आहे. शेतकऱ्यांनी वारंवार याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजविले. परंतु उपयोग झाला नाही. आता मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी पांडुरंग वानखेडे, सत्यपाल कांबळे, श्रीराम वानखडे यांनी उमरखेड येथे आयोजित पत्रपरिषदेत दिला. यावेळी संजय जयस्वाल उपस्थित होते.