शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कालवे अपूर्णच : प्रकल्पग्रस्तांच्या समस्याही कायम

By admin | Updated: December 29, 2016 00:26 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील बेंबळा नदीवर उभारलेल्या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण

आरिफ अली  बाभूळगाव कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील बेंबळा नदीवर उभारलेल्या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण असून या प्रकल्पाचे हजारो लिटर पाणी पाटसऱ्यांअभावी वाहून जात आहे. बेंबळा कालव्याचे पाणी सैराट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. तसेच प्रकल्पग्रस्तांच्याही समस्या अद्यापही कायम आहे. ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्प सध्या २१० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. परंतु या प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाही. पुनर्वसित गावांमध्ये फेरफटका मारला तर समस्या दृष्टीस पडतात. कालवा निर्मितीकरिता केलेला २१० कोटी रुपयांचा खर्चसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. अद्यापही कालव्यांचे काम पूर्ण झाले नाही. सद्यस्थितीत बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून रबीकरिता सोडलेले पाणी सैराट झाले आहे. वाट मिळेल तिथे पाणी झिरपत असून पाटसऱ्या न बांधल्याने लाखो लिटर पाण्याचा पव्यय होत आहे. विदर्भातील प्रकल्प का रखडले, तळाशी असलेला गोंधळ शोधून काढण्यासाठी वेद, लोकनायक बापूजी अणे, भारतीय किसान संघ, स्मारक समिती व स्वदेशी जागरण मंच या पाच संघटना एकत्र आल्या. त्यांनी विदर्भ सिंचन शोधयात्रा सुरू केली. त्यात बेंबळा प्रकल्पावर संघटनेचे कार्यकर्ते २३ आॅगस्ट २०१५ रोजी आले होते. त्यावेळी खडक सावंगास्थित विश्रामगृहावर या शोधयात्रेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या कालवा क्षेत्रातील ३० किमीपर्यंत कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कालव्याचे काम अर्धवट दिसल्याने पदाधिकारी अधिकच संतापले. यानंतर कोपरा जानकर येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या सभेत अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले. त्यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु २० महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. अलिकडे आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्तांच्या काही समस्या सुटल्या. पंरतु अद्यापही अनेक समस्या कायम आहे. किमान १८ नागरी सुविधाही त्यांना अद्यापपर्यंत मिळाल्या नाही. त्यामुळे बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे जगणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी कळंब येथे येत आहे. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीतरी घोषणाकरतील अशी अपेक्षा आहे.