शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

मारेगावात प्रचाराचा धडाका

By admin | Updated: October 21, 2015 02:49 IST

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाल्याने आता बुधवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

पंचरंगी लढतीमुळे चुरस : बंडखोरांमुळे पक्षीय उमेदवार सापडले अडचणीतमारेगाव : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाल्याने आता बुधवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वच पक्ष स्वबळावर सत्तेत येण्यासाठी जनमत आजमावत आहे. त्यामुळे सर्व प्रभागात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्याच्या हेतूने सर्वच राजकीय पक्षांनी येथील नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एका वर्षाने होणाऱ्या या निवडणुकीत पाचही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मरगळ झटकून कंबर कसली आहे. परिणामी नगरपंचायत निवडणूक खुपच चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत पाचही राष्ट्रीय पक्ष ताकदीने उतरले आहे. तथापि एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नसल्याने जो-तो पक्ष ‘पळा-पळा, आघाडी मिळवा’, या तत्वाने पळत सुटले आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी, विविध पक्षांच्या नेत्यांमध्येच चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत कोणतीही कसर सोडायची नाही, असा चंगच या पक्षांच्या प्रमुखांनी बांधला आहे. आता पुढील १० दिवस प्रचाराचा धडाका रंगणार आहे. त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहे. या चुरशीत राज्यस्तरीय नेत्यांना प्रचाराच्या रणांगणात उतरविण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे बुधवारपासून १० दिवस शहरवासीयांना राजकीय कलगीतुरा फुकटात बघता येणार आहे. राष्ट्रीय पक्षांची येथील सतराही प्रभागात मातब्बर व सक्षम उमेदवार शोधण्यासाठी अक्षरश: दमछाक झाली होती. यातच काँग्रेस व शिवसेनेपुढे बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडोबांना थोपवताना या पक्षांची दमछाक होत आहे. येथील नगरपंचायतीवर पहिला झेंडा फडकविण्यासाठी किमान नऊ नगरसेवकांची गरज भासणार आहे. हा जादूई आकडा पार करण्याची सध्या कोणत्याच पक्षाला आशा असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)झरी : येथील नगरपंचायतीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आता प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे.देशात सर्वात लहान नगरपंचायत म्हणून या नगरपंचायतीची ओळख निर्माण होणार आहे. १ हजार ५६ मतदार मतदान करणार आहे. मतदार कमी असल्याने अत्यंत कमी फरकाने उमेदवार विजयी व पराजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पक्ष व उमेदवारांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने मोठा निधी मिळणार आहे. परिणामी गाावाच्या विकासाची मोठी संधी मिळणार आहे. कमी लोकसंख्या व मोठा निधी, यामुळे बरीच विकास कामे करण्याची संधी विजयी उमेदवारांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज लागणार आहे. झरीमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, शौचालयाची व्यवस्था, ले-आऊटमधील समस्या, बाजारासाठी स्वतंत्र जागा, प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था, महिला प्रसाधनगृहे यासह अनेक मूलभूत सुविधांची गरज आहे.या निवडणुकीत १६ जागांसाठी आता ६१ उमेदवार रिंगणात कायम आहे. या १६ जागांसाठी विविध पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे. अपक्ष उमेदवारही ताकदीने लढताना दिसत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसा प्रचारात बदल करावा लागणार आहे. मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता विवेकबुद्धीने उमेदवार निवडण्याची खरी गरज आहे. (प्रतिनिधी)