शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कॉपीमुक्तीसाठी अभियान

By admin | Updated: February 20, 2017 01:30 IST

जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपासून बारावी, तर सात मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.

सचिंद्र प्रताप सिंह : भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनयवतमाळ : जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपासून बारावी, तर सात मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यावर्षी शंभर टक्के कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बचत भवन येथे परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक त्यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी दीपककुमार मीना, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.परिक्षेसाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तथा महत्वाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना भरारी पथक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. या पथकांनी केंद्रांवर भेटी देऊन चांगल्या वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी काम करावे, असे ते म्हणाले. भरारी पथक दिवसभरात किमान तीन ते चार केंद्रांना भेटी देतील. किमान पाऊण ते एक तास पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रावर थांबून पाहणी करावी, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या दिवशी अधिक दक्ष राहून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.परीक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप होणार नाही. तसेच केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केंद्रात प्रवेश करताना कॉपीला पायबंद घालण्यासाठी संशयितांची तपासणी केली जाणार आहे. महिला, मुलींची तपासणी महिला पोलिस कर्मचारी घेतील. (प्रतिनिधी)बैठे पथकांची भूमिका महत्त्वाचीकॉपीला आळा घालण्यासाठी बैठे पथकांची भूमिका महत्त्वाची आहे. या पथकांनी अधिक दक्ष राहून काम केल्यास कॉपीवर पूर्णपणे आळा बसू शकतो. त्यामुळे या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या केंद्रांवर बैठे पथक असतानाही उपद्रव आढळून येतील, त्या पथकांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.