शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

फरदड मुक्तीसाठी राज्यातील २८ हजार गावांमध्ये अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:42 IST

ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सूचना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेतल्यास उपद्रव वाढणार आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे.बोंडअळी नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेऊ नये, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाने अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचविण्यासाठी गावांमध्ये जागृती अभियान राबविले जाणार आहे. २८ हजार गावात ही मोहीम राबविली जाणार आहे. फरदड न घेता पिकाचे अवशेष नष्ट करण्याच्या सूचना आहे. या सूचना डॉ. प्रमोद यादगिरवार, सहाय्यक संशोधन संचालक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी दिल्या आहेत.ढगाळ वातावरणामुळे अळीला पोषक स्थिती आहे. राज्यभरात गुलाबी बोंडअळी आल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठाने फरदडीचे पीक न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी आयुक्तालयाने याबाबत खरबरदारीचे आदेश दिले आहे. शेतकरी या आदेशाची अंमलबजावणी कशी करतात, यावरच कीडीचा बंदोबस्त अवलंबून राहणार आहे.सहा लाख हेक्टरचे आव्हानयावर्षी कापसाला चांगला दर आहे. यामुळे पाण्याची व्यवस्था असणारे शेतकरी फरदड पीक घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे फरदडीचे पीक घेतल्या जाण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :agricultureशेती