शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

फरदड मुक्तीसाठी राज्यातील २८ हजार गावांमध्ये अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:42 IST

ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सूचना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेतल्यास उपद्रव वाढणार आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे.बोंडअळी नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेऊ नये, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाने अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचविण्यासाठी गावांमध्ये जागृती अभियान राबविले जाणार आहे. २८ हजार गावात ही मोहीम राबविली जाणार आहे. फरदड न घेता पिकाचे अवशेष नष्ट करण्याच्या सूचना आहे. या सूचना डॉ. प्रमोद यादगिरवार, सहाय्यक संशोधन संचालक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी दिल्या आहेत.ढगाळ वातावरणामुळे अळीला पोषक स्थिती आहे. राज्यभरात गुलाबी बोंडअळी आल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठाने फरदडीचे पीक न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी आयुक्तालयाने याबाबत खरबरदारीचे आदेश दिले आहे. शेतकरी या आदेशाची अंमलबजावणी कशी करतात, यावरच कीडीचा बंदोबस्त अवलंबून राहणार आहे.सहा लाख हेक्टरचे आव्हानयावर्षी कापसाला चांगला दर आहे. यामुळे पाण्याची व्यवस्था असणारे शेतकरी फरदड पीक घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे फरदडीचे पीक घेतल्या जाण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :agricultureशेती