शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मंत्रिमंडळ उपसमिती न्यायालयाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:08 IST

बोगस आदिवासींवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही राज्य सरकारने ११ महिने काहीही केले नाही. आता मंत्रिमंडळ उपसमिती नेमून वेळकाढूपणा केला जात आहे.

ठळक मुद्देदशरथ मडावी : यवतमाळात राज्यस्तरीय बिरसा अभिवादन परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आदिवासींवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही राज्य सरकारने ११ महिने काहीही केले नाही. आता मंत्रिमंडळ उपसमिती नेमून वेळकाढूपणा केला जात आहे. ही उपसमिती म्हणजे, न्यायालयाचा अवमान आहे. आता या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत, असे प्रतिपादन बिरसा क्रांतिदलाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले.येथील सहकार भवनात बिरसा क्रांतिदलाच्या वतीने राज्यस्तरीय बिरसा अभिवादन परिषद पार पडली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. दशरथ मडावी म्हणाले की, ६ जुलै २०१७ रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील सर्व न्यायालये, राज्य शासनांवर बंधनकारक आहे. त्यामुळे जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनास कोणताही वैधानिक मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे ५ जून रोजी स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी विसंगत असून न्यायालयाचा अपमान करणारी आहे. त्यामुळे ५ जून रोजीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.यावेळी मंचावर अ‍ॅड. सुरेश माने, राज्य उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, उत्तम कनाके, राज्य महासचिव प्रमोद घोडाम, राज्य संघटक प्रा. वसंत कनाके, किरण कुमरे, राजेश मस्के, संतोष ठाकरे, कैलास मडावी, मरोती उईके, कमलेश आत्राम, अतुल मसराम आदी उपस्थित होते. या अभिवादन परिषदेला अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन प्रा. कैलास बोके, तर आभार संजय मडावी यांनी मानले. यशस्वितेसाठी अतुल कोवे, लक्ष्मण पंधराम, रमेश मडावी, प्रमोद मडावी, नारायण पिलवंड, शरद चांदेकर, दीपक करचाल आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ