शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मंत्रिमंडळ उपसमिती न्यायालयाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:08 IST

बोगस आदिवासींवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही राज्य सरकारने ११ महिने काहीही केले नाही. आता मंत्रिमंडळ उपसमिती नेमून वेळकाढूपणा केला जात आहे.

ठळक मुद्देदशरथ मडावी : यवतमाळात राज्यस्तरीय बिरसा अभिवादन परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आदिवासींवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही राज्य सरकारने ११ महिने काहीही केले नाही. आता मंत्रिमंडळ उपसमिती नेमून वेळकाढूपणा केला जात आहे. ही उपसमिती म्हणजे, न्यायालयाचा अवमान आहे. आता या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत, असे प्रतिपादन बिरसा क्रांतिदलाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले.येथील सहकार भवनात बिरसा क्रांतिदलाच्या वतीने राज्यस्तरीय बिरसा अभिवादन परिषद पार पडली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. दशरथ मडावी म्हणाले की, ६ जुलै २०१७ रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील सर्व न्यायालये, राज्य शासनांवर बंधनकारक आहे. त्यामुळे जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनास कोणताही वैधानिक मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे ५ जून रोजी स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी विसंगत असून न्यायालयाचा अपमान करणारी आहे. त्यामुळे ५ जून रोजीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.यावेळी मंचावर अ‍ॅड. सुरेश माने, राज्य उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, उत्तम कनाके, राज्य महासचिव प्रमोद घोडाम, राज्य संघटक प्रा. वसंत कनाके, किरण कुमरे, राजेश मस्के, संतोष ठाकरे, कैलास मडावी, मरोती उईके, कमलेश आत्राम, अतुल मसराम आदी उपस्थित होते. या अभिवादन परिषदेला अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन प्रा. कैलास बोके, तर आभार संजय मडावी यांनी मानले. यशस्वितेसाठी अतुल कोवे, लक्ष्मण पंधराम, रमेश मडावी, प्रमोद मडावी, नारायण पिलवंड, शरद चांदेकर, दीपक करचाल आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ